शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘स्वरसंजीवनातून’ भजनरंगाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:15 IST

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... माझे चित्त तुझे पायी... काहे मोरी बात छेडत नंदलाला... या भजन आणि शास्त्रीय रागांतील रचनांची स्वरानुभूती रसिकांनी घेतली.

पुणे : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... माझे चित्त तुझे पायी... काहे मोरी बात छेडत नंदलाला... या भजन आणि शास्त्रीय रागांतील रचनांची स्वरानुभूती रसिकांनी घेतली. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भजनांच्या विविध नाविन्यपूर्ण रचना सादर करत गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी श्रोत्यांवर स्वरमोहिनी घातली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडामंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वर संजीवन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात यमन रागातील ‘कहे सखी कैसे केकरिये’ या रचनेने झाली. शास्त्रीय संगीतात मधुकंस रागातील रचनांची पेशकेश देखील यावेळी झाली. संत नामदेव यांची ऐसे पंढरीचे स्थान, याहूनी आणिक आहे कोण या पंढरीचे वर्णन असलेल्या रचलेला श्रोत्यांनी विशेष दाद दिली. संत रामदासांनी प्रभू श्रीरामावरील केलेल्या ध्यान लागते रामाचे, दु:ख हरले जन्माचे या अभंगात रसिक तल्लीन झाले.मैफलीच्या उत्तरार्धात संगीता जोशी यांनी लिहीलेल्या व केदार जोशी यांनी संगीतबद्ध केलेल्या गायक कलावंताच्या मनोगतात्मक गीताचे सादरीकरण झाले. ही सूरांची बिल्वपत्रे, वाहतो मी भक्तीभावे या गीतांतून कलावंताच्या मनात सुरु असलेल्या विचारांचेसार उपस्थितांसमोर उलगडले. केदार पंडित (तबला), तन्मय देवचके (हार्मिनियम), अपूर्वद्रविड (तालवाद्य), मृण्मयीफाटक व मुग्धा गावकर यांनी गायनसाथ दिली.