शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटेशाशी नातं जोडण्याची प्रक्रिया भागवत धर्मानं शिकविली : अभय टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:15 IST

पुणे: व्यंकटेश हा प्रकृतीनं वेगळा देव आहे. मात्र असं असूनही त्याच्याशी नातं कसं जोडायचं ही प्रक्रिया भागवत धर्मानं ...

पुणे: व्यंकटेश हा प्रकृतीनं वेगळा देव आहे. मात्र असं असूनही त्याच्याशी नातं कसं जोडायचं ही प्रक्रिया भागवत धर्मानं शिकवली. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असं म्हणत व्यंकटेशाला रोजच्या व्यवहारात संत ज्ञानदेवांनी बसवलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसंच यानिमित्तानं शिवोपासनेकडून विष्णूपासनेकडे झालेला प्रवासही आपण समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी केले.

गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने ‘तिरुपती बालाजी’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विश्वकर्मा पब्लिकेशनचे मनोहर सोनवणे आणि दीपक करंदीकर लिखित ‘तिरुपती’ या कादंबरीचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. रमण चितळे, समीक्षक रुपाली शिंदे, प्रा. श्याम भुर्के, गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, अध्यक्ष अशोक कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

टिळक म्हणाले, ‘आपल्याकडे अवतार ही संकल्पना आहे. म्हणजेच पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एकतत्त्व काळाच्या टप्प्यावर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत राहणे असा त्याचा अर्थ आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘देवालये श्रीमंत होणं आणि आपल्याकडे सर्वांत जास्त कुपोषित मुलं असणं याचं चिंतन होणं गरजेचं असून देशाचं सामाजिक सांस्कृतिक विघटन टाळण्यासाठी संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे आहे.’

कार्यक्रमात राधिका रमण चितळे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार, उषा अशोक माडेकर आणि डॉ. सुनीता दिवाकर यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार, तर पंडित वसंत गाडगीळ यांना आदर्श समाजशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले. डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी आभार मानले.

......