शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटेशाशी नातं जोडण्याची प्रक्रिया भागवत धर्मानं शिकविली : अभय टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:15 IST

पुणे: व्यंकटेश हा प्रकृतीनं वेगळा देव आहे. मात्र असं असूनही त्याच्याशी नातं कसं जोडायचं ही प्रक्रिया भागवत धर्मानं ...

पुणे: व्यंकटेश हा प्रकृतीनं वेगळा देव आहे. मात्र असं असूनही त्याच्याशी नातं कसं जोडायचं ही प्रक्रिया भागवत धर्मानं शिकवली. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असं म्हणत व्यंकटेशाला रोजच्या व्यवहारात संत ज्ञानदेवांनी बसवलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसंच यानिमित्तानं शिवोपासनेकडून विष्णूपासनेकडे झालेला प्रवासही आपण समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी केले.

गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने ‘तिरुपती बालाजी’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विश्वकर्मा पब्लिकेशनचे मनोहर सोनवणे आणि दीपक करंदीकर लिखित ‘तिरुपती’ या कादंबरीचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. रमण चितळे, समीक्षक रुपाली शिंदे, प्रा. श्याम भुर्के, गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, अध्यक्ष अशोक कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

टिळक म्हणाले, ‘आपल्याकडे अवतार ही संकल्पना आहे. म्हणजेच पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एकतत्त्व काळाच्या टप्प्यावर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत राहणे असा त्याचा अर्थ आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘देवालये श्रीमंत होणं आणि आपल्याकडे सर्वांत जास्त कुपोषित मुलं असणं याचं चिंतन होणं गरजेचं असून देशाचं सामाजिक सांस्कृतिक विघटन टाळण्यासाठी संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे आहे.’

कार्यक्रमात राधिका रमण चितळे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार, उषा अशोक माडेकर आणि डॉ. सुनीता दिवाकर यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार, तर पंडित वसंत गाडगीळ यांना आदर्श समाजशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले. डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी आभार मानले.

......