शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

घरकुल योजनेचा फायदा चाळमालकांना

By admin | Updated: May 25, 2014 04:49 IST

र्षानुवर्षे वास्तव्यास असणार्‍या भाडेकरूंना कोणत्याही कटकटीशिवाय घराबाहेर काढणे घरमालकांना महापालिकेच्या घरकुल योजनेमुळे सुकर बनले आहे

पिंपरी : वर्षानुवर्षे वास्तव्यास असणार्‍या भाडेकरूंना कोणत्याही कटकटीशिवाय घराबाहेर काढणे घरमालकांना महापालिकेच्या घरकुल योजनेमुळे सुकर बनले आहे. घरमालक-भाडेकरू वाद संपुष्टात आणण्यास ही योजना उपयुक्त ठरली आहे. अर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी महापालिकेने स्वस्त घरकुल योजना राबवली. १३ हजार २५० घरांच्या या योजनेत पहिल्या टप्प्यात ६७२० पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप होऊ लागले आहे. या योजनेत अर्ज केलेले बहुतांश अर्जदार हे चाळीत भाडेपट्ट्याने राहणारे आहेत. वर्षानुवर्षे चाळीतील छोट्या घरात दिवस काढणार्‍या नागरिकांना महापालिकेच्या घरकुल योजनेत हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झाला. घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वी लाभार्थी ज्या ठिकाणी भाड्याने राहात होता, त्या मूळ घरमालकाकडून लाभार्थ्याने घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून महापालिकेस सादर करणे बंधनकारक केले आहे. कोणताही वाद न घालता, भाडेकरूचे हक्क प्रस्थापित न करता भाडेकरू घर सोडतात. हे घरमालकाच्या दृष्टीने फायद्याचे ठरू लागले आहे. घरकुल प्रकल्पात घर मिळाल्याने विनाकटकट भाडेकरू घर सोडतात. त्यामुळे अनेक घरमालक भाडेकरूंना त्वरित ना हरकत दाखला देत आहेत. मात्र काहींना ना हरकत देताना भीती वाटू लागली आहे. भाडेकरूसंबंधी दस्तऐवज तयार झाल्यास भविष्यात कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते, या भीतीने काही घरमालक असा दाखला देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. ना हरकत दाखला देण्यास घरमालकांकडून अडवणूक होऊ लागल्याने लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. महापालिकेच्या योजनेत घर मिळाल्याने भाडेकरू गावठाण भागातील चाळीतील भाड्याची खोली सोडण्यास तयार होतात, हेच घरमालकांना अधिक फायद्याचे वाटू लागले आहे. वर्षानुवर्षे राहणार्‍या भाडेकरूला बाहेर काढून खोली रिकामी करणे घरमालकांना अत्यंत अवघड जाते. घराच्या बदल्यात घर अथवा आर्थिक मोबदला दिल्याशिवाय भाडेकरूकडून खोली रिकामी करून घेता येत नाही, हे घरमालकांना माहिती आहे. पण या योजनेमुळे विनाकटकट भाडेकरू बाहेर पडू लागल्याची बाब सर्वचदृष्टीने घरमालकांना फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला दीड लाखात घरकुल अशी महापालिकेची घोषणा होती. बांधकाम खर्च वाढल्याने घरकुलाची किंमत ३ लाख ७६ हजार झाली. महापालिकेने पुढाकार घेऊन लाभार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले. घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच लाभार्थ्यांना घराचा ताबा दिला जातो. (प्रतिनिधी)