शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अन्नसुरक्षा योजनेतील २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने एप्रिलअखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने एप्रिलअखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गरीब व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून, राज्य शासनाने मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील सुमारे २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु अद्याप याबाबतचा स्पष्ट अध्यादेश आला नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सांगितले.

केंद्र सरकारने मागील लॉकडाऊनच्या कालावधीत केशरी शिधापत्रिकाधारकांना आठ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १२ रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिला होता. ही योजना मागील नोव्हेंबरपर्यंत होती. सध्याच्या कोरोना कालावधीत केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याची गरज आहे. अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सध्या प्रत्येकी दोन रुपये दराने तीन किलो गहू आणि तीन रुपये दराने दोन किलो तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. या योजनेतील जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे २ लाख ६९ हजार असून, लाभार्थ्यांची संख्या २६ लाख ९० हजार एवढी आहे.

अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सध्या अत्यल्प दराने गहू-तांदूळ मिळतच आहे. त्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला, ही चांगली बाब आहे. परंतु केशरी शिधापत्रिकाधारकांनाही कमी दरात धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत रेशन दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष गणेश डांगी यांनी व्यक्त केले.

-----

चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकांनामधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाववाढीच्या अनेक ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.

-------

जिल्ह्यात ग्रामीण भागातील एवढ्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

आंबेगाव- 210089

बारामती - 369019

भोर - 130547

दौंड- 249386

हवेली - 85270

इंदापूर- 305976

जुन्नर- 297820

खेड - 306907

मावळ- 190062

मुळशी - 87474

पुरंदर- 172147

शिरूर- 248947

वेल्हा - 36706