शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाम वाळूचोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 25, 2017 02:57 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागतील खानवटे येथील नदीपात्रात रात्रीच्या सुमारे १५-२0 फायबर बोटी आणि सेक्शन बोटीने बेकायदा वाळू उपशाने थैमान घातले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागतील खानवटे येथील नदीपात्रात रात्रीच्या सुमारे १५-२0 फायबर बोटी आणि सेक्शन बोटीने बेकायदा वाळू उपशाने थैमान घातले आहे. येथील नदीपात्रावरील अत्यंत महत्त्वाचा असा मुंबई -हैदराबाद रेल्वे पुलाच्या जवळच पायथ्याला वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे या पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथील भूखंडाचा शासकीय लिलाव झालेला होता. मात्र, याच वाळू उपशावरून भिगवण येथील एका युवकाला आपल्या प्राणाशी मुकावे लागले होते. सध्या याच ठिकाणी वाळू उपशावरून ग्रामस्थ आणि वाळूतस्कर यांच्यात वारंवार वाद होत आहेत. भविष्यात येथे मागील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.अहोरात्र वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केल्याने गावातील रस्ते देखील डबघाईला आलेले आहेत. तसेच नदी पत्रातून शेतकऱ्यांनी शेतीसाठी जलवाहिन्या नेलेल्या आहेत त्या देखील ठिकठिकाणी फुटल्या आहे. मात्र हे वाळू तस्कर कोणालाही न जुमानता वाळूची चोरी मोठ्या प्रमाणावर करत आहे गावातील नागरिकांनाही दमदाटी देत आहेत. येथील वाळू चोरी विषय येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला याची जाणीव करूनदेखील प्रशासन याकडे डोळेझाक का करीत आहे? येथील बेकायदेशीर वाळू वाहतूक बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.येथील रेल्वे पुलाच्या पायथ्याला वाळू उपसा केल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या ठिकाणी अशीच वाळू चोरी राहिली तर पूल कोसळल्याशिवाय राहणार नाही, असे येथील जाणकार मंडळींकडून बोलले जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. या व्यवसायातून कमी वेळात अधिक पैसे मिळत असल्याने या वाळूचोरांची मुजोरी वाढत आहे. गावातील नागरिकांना कोणालाच ते जुमानत नाहीत.