शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

बेलगाम वाळूचोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 25, 2017 02:57 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागतील खानवटे येथील नदीपात्रात रात्रीच्या सुमारे १५-२0 फायबर बोटी आणि सेक्शन बोटीने बेकायदा वाळू उपशाने थैमान घातले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागतील खानवटे येथील नदीपात्रात रात्रीच्या सुमारे १५-२0 फायबर बोटी आणि सेक्शन बोटीने बेकायदा वाळू उपशाने थैमान घातले आहे. येथील नदीपात्रावरील अत्यंत महत्त्वाचा असा मुंबई -हैदराबाद रेल्वे पुलाच्या जवळच पायथ्याला वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे या पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथील भूखंडाचा शासकीय लिलाव झालेला होता. मात्र, याच वाळू उपशावरून भिगवण येथील एका युवकाला आपल्या प्राणाशी मुकावे लागले होते. सध्या याच ठिकाणी वाळू उपशावरून ग्रामस्थ आणि वाळूतस्कर यांच्यात वारंवार वाद होत आहेत. भविष्यात येथे मागील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.अहोरात्र वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केल्याने गावातील रस्ते देखील डबघाईला आलेले आहेत. तसेच नदी पत्रातून शेतकऱ्यांनी शेतीसाठी जलवाहिन्या नेलेल्या आहेत त्या देखील ठिकठिकाणी फुटल्या आहे. मात्र हे वाळू तस्कर कोणालाही न जुमानता वाळूची चोरी मोठ्या प्रमाणावर करत आहे गावातील नागरिकांनाही दमदाटी देत आहेत. येथील वाळू चोरी विषय येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला याची जाणीव करूनदेखील प्रशासन याकडे डोळेझाक का करीत आहे? येथील बेकायदेशीर वाळू वाहतूक बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.येथील रेल्वे पुलाच्या पायथ्याला वाळू उपसा केल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या ठिकाणी अशीच वाळू चोरी राहिली तर पूल कोसळल्याशिवाय राहणार नाही, असे येथील जाणकार मंडळींकडून बोलले जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. या व्यवसायातून कमी वेळात अधिक पैसे मिळत असल्याने या वाळूचोरांची मुजोरी वाढत आहे. गावातील नागरिकांना कोणालाच ते जुमानत नाहीत.