शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

प्रशिक्षणासाठी बीईजी सक्षम

By admin | Updated: June 21, 2016 00:37 IST

लष्कराच्या विविध मोहिमा तसेच आपत्कालिन परिस्थितीत देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) सक्षम असल्याचे दिसून आले.

पुणे : लष्कराच्या विविध मोहिमा तसेच आपत्कालिन परिस्थितीत देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) सक्षम असल्याचे दिसून आले. याठिकाणी जवानांना अतिशय खडतर असे प्रशिक्षण दिले जात असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची माहिती देताना ब्रिगेडियर धीरज मोहन यांनी दिली. नौसा, आर्मी पब्लिक स्कूल व केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी प्रशिक्षण घेतलेल्या या संस्थेला पत्रकारांनी सोमवारी भेट दिली. लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या मुलांना सलग ९४ आठवडे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविले जाते. अशा प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेले जवान त्यानंतर देशसेवेसाठी तयार असतात. ब्रिगेडियर मोहन म्हणाले, ‘‘आतापर्यंत या संस्थेमध्ये ३२ हजार जवानांनी प्रशिक्षण घेत लष्करामध्ये अतिशय चोख कामगिरी बजावली आहे. संस्थेचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असून, लष्करी प्रशिक्षण देणे हीच संस्थेची मुख्य ओळख आहे. लष्करातील जवानांना शिपाई म्हणून संबोधले जाते, बीईजीमधील जवानांना सॅपर्स म्हणून संबोधले जाते. लष्कराच्या तळावर काम करत असतानाही शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगांचा शोध घेणे आणि भूसुरुंग निकामी करण्याचे प्रशिक्षण हा या प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग आहे.’’ येथील विद्यार्थी क्रीडाक्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत असून, रोइंगमध्ये दत्तू भोकर आणि नेमबाजीत गुरुप्रीत सिंग हे २०१६च्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. याबरोबरच सीमाभागातील रस्त्यांची उभारणी, पुलांची बांधणी करणे ही कामेही हे जवान कौशल्याने पूर्ण करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)