शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्येचे माहेरघर ‘स्वच्छ शहर’ व्हावे !

By admin | Updated: December 11, 2014 00:35 IST

विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले.

पुणो : विद्येचे माहेरघर आणि आयटी सिटी असलेल्या पुणो शहराची ‘स्वच्छ शहर’ अशी नवी ओळख निर्माण व्हावी. त्यासाठी महापालिकेने लोकसहभागाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वच्छतेसाठी करावा; तसेच, विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले. 
महापालिकेतर्फे लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियानाच्या पुरस्काराचे वितरण डॉ. गाडे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसे गटनेते बाबू वागसकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप व सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी उपस्थित 
होते.  
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 74 ला (चैतन्यनगर) प्रथम क्रमांकाचा, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 68 ला दुसरा, येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक एकला तिस:या क्रमांकाचा, तर कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 26ला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी स्थानिक 
नगरसेवक, सहायक आयुक्त व आरोग्य निरीक्षकांनी पुरस्कार स्वीकारला. 
 शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी अभियानाचे लोकआंदोलन झाले पाहिजे, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविकामध्ये केले. मदन वाव्हळ यांनी सूत्रसंचालन, उपमहापौर आबा बागुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
4राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव माहिती- तंत्रज्ञानामुळे जगभर गेले आहे. अनेक गोष्टींमध्ये पुढे असलेल्या  शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, अस्वच्छता हेच रोगराईचे मूळ आहे. त्यामुळे सर्वानी मिळून स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होऊया, असे आवाहन डॉ. गाडे यांनी केले. शहरातील कच:याचा प्रश्न बिकट आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग झीरो गार्बेज करण्याची आवश्यकता 
आहे. 
4त्यासाठी कमी कचरा निर्माण करणो आणि कच:याचा पुनर्वापर करण्यासाठी चारसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षा आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केली.