शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

विद्येचे माहेरघर ‘स्वच्छ शहर’ व्हावे !

By admin | Updated: December 11, 2014 00:35 IST

विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले.

पुणो : विद्येचे माहेरघर आणि आयटी सिटी असलेल्या पुणो शहराची ‘स्वच्छ शहर’ अशी नवी ओळख निर्माण व्हावी. त्यासाठी महापालिकेने लोकसहभागाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वच्छतेसाठी करावा; तसेच, विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले. 
महापालिकेतर्फे लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियानाच्या पुरस्काराचे वितरण डॉ. गाडे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसे गटनेते बाबू वागसकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप व सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी उपस्थित 
होते.  
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 74 ला (चैतन्यनगर) प्रथम क्रमांकाचा, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 68 ला दुसरा, येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक एकला तिस:या क्रमांकाचा, तर कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 26ला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी स्थानिक 
नगरसेवक, सहायक आयुक्त व आरोग्य निरीक्षकांनी पुरस्कार स्वीकारला. 
 शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी अभियानाचे लोकआंदोलन झाले पाहिजे, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविकामध्ये केले. मदन वाव्हळ यांनी सूत्रसंचालन, उपमहापौर आबा बागुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
4राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव माहिती- तंत्रज्ञानामुळे जगभर गेले आहे. अनेक गोष्टींमध्ये पुढे असलेल्या  शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, अस्वच्छता हेच रोगराईचे मूळ आहे. त्यामुळे सर्वानी मिळून स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होऊया, असे आवाहन डॉ. गाडे यांनी केले. शहरातील कच:याचा प्रश्न बिकट आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग झीरो गार्बेज करण्याची आवश्यकता 
आहे. 
4त्यासाठी कमी कचरा निर्माण करणो आणि कच:याचा पुनर्वापर करण्यासाठी चारसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षा आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केली.