शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पाणीप्रश्नावर मूलभूत चिंतन

By admin | Updated: March 29, 2017 02:41 IST

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अधिक सक्षमपणे पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत

पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अधिक सक्षमपणे पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत. बाबासाहेबांनी लोकशाहीची मानवी मूल्ये रुजवली. त्या मूल्यांचा प्रसार प्रचार आपण करायला हवा. पाण्याच्या प्रश्नावर मूलभूत चिंतन त्यांनी केले होते, मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले.डॉ. दत्तात्रय गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर का जल चिंतन’ या हिंदी तसेच ‘जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘भरती-ओहटी, जीवन संघर्ष’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी गव्हाणे बोलत होते. माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, बी. जी. वाघ, पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, यशदातील संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड उपस्थित होते. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)गव्हाणे म्हणाले, की बाबासाहेबांचे विचार आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचवण्याची गरज आहे. समाजातील सर्व स्तरातील लेखकांनी बाबासाहेब आंबेडकरांवर लेखन केले. त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. खोब्रागडे म्हणाले, की पाण्याच्या संघर्षावरूनच सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध झाले. सामाजिक व आर्थिक विकासाचा मुद्दा आंबेडकरी संघटनांच्या अजेंड्यावर नाही. लेखक व विचारवंतांनी सामाजिक व आर्थिक विषयावर लेखन केले पाहिजे. सत्ताबदलानंतर दलित, शोषितांना मिळणारा निधी बंद झाला. त्यामुळे हा समाज मूलभूत गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे.