शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नावर मूलभूत चिंतन

By admin | Updated: March 29, 2017 02:41 IST

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अधिक सक्षमपणे पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत

पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अधिक सक्षमपणे पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत. बाबासाहेबांनी लोकशाहीची मानवी मूल्ये रुजवली. त्या मूल्यांचा प्रसार प्रचार आपण करायला हवा. पाण्याच्या प्रश्नावर मूलभूत चिंतन त्यांनी केले होते, मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले.डॉ. दत्तात्रय गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर का जल चिंतन’ या हिंदी तसेच ‘जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘भरती-ओहटी, जीवन संघर्ष’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी गव्हाणे बोलत होते. माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, बी. जी. वाघ, पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, यशदातील संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड उपस्थित होते. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)गव्हाणे म्हणाले, की बाबासाहेबांचे विचार आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचवण्याची गरज आहे. समाजातील सर्व स्तरातील लेखकांनी बाबासाहेब आंबेडकरांवर लेखन केले. त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. खोब्रागडे म्हणाले, की पाण्याच्या संघर्षावरूनच सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध झाले. सामाजिक व आर्थिक विकासाचा मुद्दा आंबेडकरी संघटनांच्या अजेंड्यावर नाही. लेखक व विचारवंतांनी सामाजिक व आर्थिक विषयावर लेखन केले पाहिजे. सत्ताबदलानंतर दलित, शोषितांना मिळणारा निधी बंद झाला. त्यामुळे हा समाज मूलभूत गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे.