शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पालेभाज्यांचे भाव तेजीत

By admin | Updated: July 3, 2017 02:21 IST

बाजारात आवक खूप कमी प्रमाणात होत असल्याने रविवारी कोथिंबीर, मेथीसह सर्वच पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. तर फळभाज्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बाजारात आवक खूप कमी प्रमाणात होत असल्याने रविवारी कोथिंबीर, मेथीसह सर्वच पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. तर फळभाज्यांमध्ये आवक स्थिर राहिल्याने बहुतेक भाज्यांच्या भावात फारसा चढउतार झाला नाही. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी सुमारे १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. बाजारात सध्या फळभाज्यांची आवक माफक प्रमाणात होत आहे. रविवारी टोमॅटोच्या भावात काहीशी वाढ तर घेवड्याच्या भावात घट झाली. इतर भाज्यांचे भाव मात्र स्थिर राहिले. फळभाज्या स्थिर असल्या तरी पालेभाज्यांचे भाव काही दिवसांपासून तेजीत आहेत. जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने ओढ दिली आहे. तर काही भागांत सुरूवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे. त्यामुळे सध्या बाजारात कोथिंबीर, मेथीसह सर्वच भाज्यांचे भाव तेजीत आहेत.रविवारी बाजारात कोथिंबीर आवक केवळ १५ हजार जुडी आणि सटाणा येथील १० टेम्पो आवक झाली. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव शेकडा जुडीमागे १००० ते ३ हजार रुपयांपर्यंत गेले. मेथीची आवक ३५ हजार जुडी झाली असून शेकडा जुडीमागे १००० ते १५०० रुपये भाव मिळाला. शेपू, कांदापात, चाकवत, अंबाडी, मुळे, चुका या भाज्यांचे भाव ५०० ते १५०० रुपयांपर्यंत होते. पुढील काही दिवस पालेभाज्यांचे भाव तेजीतच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.आषाढी एकादशीनिमित्त रताळ्यांची मागणी वाढलीआषाढी एकादशीनिमित्त बाजारात विविध भागांतून रताळी आली असून मागणीही चांगली आहे. सध्या बाजारात करमाळा तालुक्यातून मांजरगाव, उंदरगाव यांसह बेळगावातून मोठी आवक होत आहे. रविवारी बाजारात ३ हजार गोणी रताळी आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत आवक चांगली असल्याने भाव माफक आहे. गावरान रताळ्यांना २५ ते ३५ रुपये, तर बेळगाव रताळ्यांना १५ ते २० रुपये भाव मिळत आहे.फळांना कमी मागणीपावसामुळे फळांच्या मागणी घट झाली आहे. तसेच तोडणीही कमी प्रमाणात होत असल्याने काही फळांची आवक घटली आहे. रविवारी बाजारात लिंबाची सुमारे ७ हजार गोणी आवक झाली असून, प्रतिगोणी ५० ते १०० रुपये भाव मिळाला. कलिंगड, खरबूज, पपई या फळांना मागणी कमी झाली आहे. फुलांची भाववाढफूलउत्पादक भागात काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने फुलांना फटका बसला आहे. त्यामुळे काहीशा खराब फुलांची बाजारात अधिक आवक होत आहे. त्यामुळे चांगल्या फुलांना भाव मिळत असून बहुतेक फुलांचे भाव ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. रविवारी झेंडूला प्रतिकिलो २० ते ४०, गुलछडी ५ ते २० मोगऱ्याला १५० ते २५० रुपये भाव मिळाला.