शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, खेड तालुका घनकचरा प्रकल्पात मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये घनकचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. आतापर्यंत १ हजार १३९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, तर ६९७ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी केवळ ७२ प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहेत. मात्र, बारामती आणि खेड तालुक्यांत एकाही प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झालेली नाही.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या ३ जून ते २० सप्टेंबरदरम्यान झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात काही तालुक्यांतील काम असमाधानकारक असल्याचे समोर आले. याविषयी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागाला कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३८५ गावांमध्ये घनकचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत १ हजार १३९ गावांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यातील ६९७ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. तर केवळ ७२ प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात ९७ गावांत प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यातील ७६ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर एकाही प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. त्याबरोबरच खेड तालुक्यातील १६१ पैकी १२४ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या ठिकाणीही एकही प्रकल्प सुरु झालेले नाही.

-----------

प्रकल्पांसाठी हवी शासकीय जागा

जिल्ह्यातील ४०२ ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासकीय गायरान जागा मिळावी, या मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. तसेच ३२९ ग्रामपंचायतींनी तहसील कार्यालयांकडे सादर करण्यात आले, तर ११८ प्रस्तावांची पूर्तता करण्यात आली आहे.

चौकट

कचरा व्यवस्थापनकरिता तांत्रिक मनुष्यबळ अत्यंत आवश्यक होते. याकरिता कंत्राटी स्वरुपात ७५ अभियंत्यांची जून २०२१ पासून बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता एक अभियंताप्रमाणे ७५ जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता अभियंत्यांची नियुक्ती केलेली आहे. संबंधित अभियंते गावांमध्ये भेट देऊन गावस्तरावर घनकचरा व्यवस्थापनचे प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करत आहेत.

चौकट

स्वच्छता व आरोग्य याचा अत्यंत जवळून संबंध असून कोरोनाकाळात स्वच्छतेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. त्यानुसार सर्व गावांनी आपल्या गावातील निर्माण होणारा कचऱ्याचे उचित व्यवस्थापन वेळेत पूर्ण करुन गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे आवश्यक आहे. याकरिता गटविकास अधिकारी यांनी संबंधित सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक यांचेकडे सततचा पाठपुरावा करून मोहीम स्वरूपात निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामे सुरु करुन २ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.