शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

विजेचा शॉक लागून बापलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी : बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे कमलजामातानगरमध्ये शेतामध्ये उसाला औषधफवारणी करत असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी : बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे कमलजामातानगरमध्ये शेतामध्ये उसाला औषधफवारणी करत असताना विजेचा शॉक लागून बाप आणि मुलाचा मृत्यू झाला. रविवारी (दि.२५) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

यादव भीमाजी पटाडे (वय ७०) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे (वय ३७) असे मृत्युमुखी पडलेल्या बापलेकाची नावे आहेत. हे दोघेजण उसाच्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करत होते. त्यांच्या शेतामध्ये गेली तीन ते चार वर्षांपासून बंद पडलेल्या विद्युतवाहिनीच्या तारा होत्या. वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या. पडलेल्या तारांमध्ये विद्युतप्रवाह सुरू नसायचा. परंतु अचानकपणे विद्युतप्रवाह सुरू झाला. यावेळी फवारणी करणाऱ्या यादव पटाडे व श्रीकांत पटाडे यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पटाडे पितापुत्राच्या मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप बोरी खुर्द ग्रामस्थांनी केला आहे. गेली तीन ते चार वर्षांपासून बंद असणारी विद्युतपुरवठा करणारी लाईन बंद होती. तिच्या तारा तशाच खाली पडून होत्या. याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रारी करूनही या तारा महावितरणने हटवल्या नाहीत. वेळीच या तारा महावितरणने काढल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती.

चौकट

अनेक ठिकाणी धोकादायक तारा

महावितरणच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या अनेक तारा या धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी खांब वाकलेले आहेत. तारा धोकादायक लोंबकळलेल्या आहेत. या तारांची व विद्युतखांबांची महावितरणने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्रेही धोकादायक झाले आहेत. त्यांच्या केबल अतिशय खराब, आवरनविरहित आहेत. भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी महावितरणने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.