शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी संस्थेच्या चेअरमनला दणका

By admin | Updated: May 20, 2014 04:07 IST

नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला शासकीय अनुदान मिळालेले, तरीही पुढील शिक्षणापासून तिला वंचित ठेवून भविष्याचे नुकसान केले

पुणे : नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला शासकीय अनुदान मिळालेले, तरीही पुढील शिक्षणापासून तिला वंचित ठेवून भविष्याचे नुकसान केले. याला नर्सिंग प्रशिक्षण संस्था जबाबदार असल्याचे ग्राहक मंचाने निरीक्षण नोंदवले. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या भविष्याची नुकसानभरपाई म्हणून संस्थेच्या चेअरमनने ५० हजार नुकसानभरपाई, तिच्या फीची उर्वरित रक्कम १६, ८७० रुपये आणि तक्रारीचा खर्च ३ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष अंजली देशमुख व सदस्य एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी उत्तमनगर येथील एका विद्यार्थिनीने गुरूराज स्कूल आॅफ नर्सिंग कॉलेज, एन.डी.ए. रस्ता, उत्तमनगर यांचे चेअरमन संजय संभाप्पा झाडे यांच्याविरूद्ध ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. तक्रारदार विद्यार्थिनी ही गुरुराज स्कूल आॅफ नर्सिंग कॉलेजमध्ये आरजीएनएमच्या दुसर्‍या वर्षाला शिकत होती. तिने १९ हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमाची ४५ हजार रुपये तिला सांगण्यात आले होते. तिची परिस्थिती रक्कम देण्याइतकी नसल्याचे त्यांनी कॉलेजला सांगितले. कॉलेजने साडेतीन वर्षे स्कॉलरशीप मिळेल, असे सांगितले. यासाठी एनआरएचएम कोर्सचा बाँड लिहून घेतला. यानुसार तक्रारादारास जिल्हा परिषदेकडून दर वर्षी २५ हजार रूपये व दरमहा ५०० स्वखर्चाला मिळणार, असे सांगण्यात आले होते. तक्रारदार ही एनटी कॅटेगरीत असल्याने ४१ हजार ७५० स्कॉलरशीप मंजूर झाली. परंतु ती तक्रारदाराच्या खात्यावर आलीच नाही. संस्थेच्याच चेअरमन झाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली व प्रत्येक विद्यार्थ्याकडे फी मागण्यास सुरूवात केली. विद्यार्थ्यांनी समाजकल्याण खात्यामध्ये जाऊन माहिती घेतल्याने प्रत्येक विद्यार्थ्यास २५ हजारांप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या नावे ६ लाख जमा झाले आहेत. तसेच सरकारने एनआरएचएम या नर्सिंग कोर्ससाठी ही योजना सुरू केली होती. इतकी फी जमा असतानाही संस्थेने मानसिक छळ केला, फी भरलेली नाही सांगून द्वितीय वर्षाला बसू दिले नाही. कागदपत्रे व प्रथम वर्षाची गुणपत्रिका दिली नाही. त्यामुळे दुसरे वर्ष वाया गेले. तसेच त्यांना फोन करून नुकसान करण्याची धमकीही दिली. त्यामुळे त्यांनी फीची रक्कम व नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंचाकडे तक्रार केली. याप्रकरणी कॉलेजने फी भरल्याची पावती बनावट असल्याचा बचाव केला होता. मंचाने दोन्ही पक्षांच्या कागदपत्रांचे अवलोकन केले. त्यानुसार, तक्रारदारांनी भरलेले १९ हजार, एनआरएचएममधून मिळालेली २५ हजार व स्कॉलरशिप ४१ हजार ७५० अशी एकूण ८५ हजार ७५० रुपये जमा होते. कॉलेजची ६८ हजार ८८० रुपये फी असल्याचे गृहित धरले, तरी १६, ८७० रुपये बाकी होते. तरीही दुसर्‍या वर्षाचा प्रवेश नाकारला़ ही कॉलेजच्या सेवेतील त्रुटी आहे. तिच्या भविष्याचे नुकसान केल्याने भरपाईचा मंचाने आदेश दिला. (प्रतिनिधी)