शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

बांबू लागवडीमुळे मिळतोय शेतकऱ्यांना आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

जागतिक बांबू दिन पुणे : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला पर्याय आहे. अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तरी ...

जागतिक बांबू दिन

पुणे : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला पर्याय आहे. अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तरी बांबू मरत नाही. त्याला फुटवे येतातच. बांबू तोडणीची वेळ वगळता बांबू लागवडीला किंवा शेतीला मजुरांची फारशी गरज भासत नाही. पाच एकर शेत एकटा माणूस सांभाळू शकतो. बांबूची कापणी केल्यानंतर योग्य भावात बांबू विकून चांगले उत्पन्न हाती मिळू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी आता बांबू लागवडीचा विचार करू लागले आहेत.

पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, मावळ, मुळशी भागात बांबूची शेती अनेक शेतकरी करीत आहेत; परंतु मराठवाड्यातही आता त्याचा वापर होत आहे. त्यासाठी ‘वनराई’ संस्थेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बांबू लागवडीसाठी मदत केली जात आहे, तसेच बांबू लागवडीचे महत्त्व विशद केल्याने त्याची लागवड बाजारवाहेगाव, ता. बदनापूर, जि. जालना येथे करण्यात आली आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळावे म्हणून उपक्रम सुरू केला आहे. ओढ्यालगतची माती पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा ओढ्यात वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी बांबूचा वापर होत आहे. फळ-पिकाला मोसंबीला आधार म्हणून बांबूच्या काठ्यांचा वापर होतो. जंगलातील बांबू तोडला जात आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी लागवड केल्यास जंगल वाचतील. गावातील पडीक व उपलब्ध जमिनीवर बांबू लागवड झाली तर निसर्गाचे संवर्धन होऊ शकेल.

————————————-

बांबू लागवडीचे फायदे

बांबूला हिरवं सोनं म्हटले जाते. बांबूच्या कोंबाची भाजी करता येते. त्याच्या पानांपासून चहा तयार केला जातो. कपडेसुद्धा केले जात आहेत. बांबूचे अनेक उपयोग आहेत. औष्णिक वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या दगडी कोळशाला बांबू हा इंधन म्हणून पर्याय आहे. बांबूची लागवड वाढली तर वीज निर्मितीसुद्धा बऱ्यापैकी ग्रीन होऊ शकते. बांबूपासून बायो-सीएनजीसुद्धा तयार केला जातो. ओढ्याकाठच्या बांबू लागवडीमुळे मृदा संवर्धनाचे उद्दिष्ट साधले जात आहे. नंतर त्यातून आर्थिक लाभही मिळणार आहे.