शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

भीमा नदीपात्रातील बंधारे कोरडे ठणठणीत

By admin | Updated: November 12, 2015 02:33 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे तिन्ही बंधारे कोरडे ठणठणीत पडल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे तिन्ही बंधारे कोरडे ठणठणीत पडल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.खोरवडी, देऊळगावराजे आणि पेडगाव या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यांवरील पाण्यावरच परिसरातील शेती अवलंबून आहे. मात्र, दोन वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने गेल्या वर्षीपासूनच नदीपात्र कोरडे पडत आहे. या वर्षी आॅक्टोबरअखेरच बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतातील उभी पिके जळून जाऊ शकतात. तर, जनावरांच्या पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दौंडचा पूर्व भाग हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. येथे प्रामुख्याने ऊस हे नगदी पीक घेतले जाते. दौंड तालुक्यातील दौंड शुगर, भीमा-पाटस, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज साखर कारखाने यांसह कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगरला मोठ्या प्रमाणात ऊसपुरवठा होत असतो. मात्र, चालू वर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने नवीन ऊसलागवड करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याचे असल्याने जवळजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात नवीन ऊसलागवडीत अंदाजे ४० टक्के घट झाली असल्याचे येथील शेतकरी जगन्नाथ बुऱ्हाडे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी नवीन ऊसलागवड विहीर, विंधन विहिरीवर अवलंबून केली आहे अशा विहिरी, विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने त्यांच्यापुढे ऊसपीक जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दौंडच्या पूर्व भागातील शेतमजुरांवर दुष्काळाचे सावट आले आहे. कारण, येथील बागायती पट्ट्यातील शेतातच शेतमजुरी करून आपल्या दैनंदिन गरजा भागवत असल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसलागवड न झाल्याने त्यांना काम मिळणे कठीण होणार आहे. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (वार्ताहर)