शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

पाणीपट्टी चुकविणाऱ्या श्रीमंतांवर बडगा..!

By admin | Updated: January 13, 2017 02:26 IST

पाणीपट्टी चुकविणाऱ्या धनधांडग्यांना जरब बसविण्यासाठी जलसंपदा खाते सरसावले आहे.

बारामती : पाणीपट्टी चुकविणाऱ्या धनधांडग्यांना जरब बसविण्यासाठी जलसंपदा खाते सरसावले आहे. ५ ते १० वर्षांपासून या धनदांडग्या बागायतदारांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता या बड्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा बोजा चढविण्यात येणार आहे.बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतीला नीरा डावा कालव्यातील पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी जलसंपदा खात्याच्या वतीने प्रतिएकरनुसार पाणीपट्टी आकारणी करण्यात येते. नोटाबंदीनंतर सर्व शासकीय खात्यांच्या थकीत रकमेसाठी जुन्या नोटा भरणा करण्याची मुभा शासनाने दिली होती. त्यामुळे जुन्या नोटांचा भरणा करून थकबाकी भरण्यासाठी पाटबंधारे खाते वगळता सर्व शासकीय खात्यांना वसुलीला चांगला प्रतिसाद मिळाला. महावितरण, नगरपालिका, आरटीओ आदी कार्यालयांमध्ये लाखोंचा भरणादेखील झाला. मात्र, पाटबंधारे खात्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे अल्प प्रमाणात खात्याला पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद मिळाला. बारामती आणि पणदरे पाटबंधारे उपविभागाकडे नोव्हेंबर २०१६ अखेर एकूण ९ कोटी ४ लाख ५७ हजार रुपये थकबाकी होती. त्यापैकी नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या भरण्याद्वारे दोन्ही उपविभागांत४ लाख ५५ हजार रुपयांची वसुली झाली.जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर हा बोजा चढविला जाणार नाही. मात्र, ५ ते १० वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या धनदांडग्यांचे प्रमाण अधिक आहे. ५ हजारांपासून अगदी १ लाखापर्यंत ही थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या धनदांडग्यांच्या सात-बारा उताऱ्यावर संबंधित रकमेचा बोजा चढविला जाणार आहे. संबंधित रक्कम आणि नावे तहसील कार्यालयाला कळविण्यात आली आहेत. पाटबंधारे खाते सरसावले, कळवूनही वसुली झाली नाही१ ते २ वर्षांची चालू थकबाकी असलेले शेतकरी थकबाकी भरतात. काही आर्थिक अडचणींमुळे थकबाकी भरण्यासाठी या शेतकऱ्यांकडून विलंब होतो. मात्र, पाणीपट्टी भरली जाते. मात्र, गेल्या ५ ते १० वर्षांपासून थकीत असणारी पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाटबंधारे खाते सरसावले आहे. साखर कारखान्यांना कळवूनदेखील मोठे थकबाकीदारांकडून वसुली झाली नाही. मागेल तेवढे पाणी घ्यायचे. वर्षानुवर्षे पाणीपट्टी न भरण्याची यांची मानसिकता आहे. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविण्याशिवाय पर्याय नाही. या धनदांडग्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आता बोजा चढविण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाने सुरू केली आहे.