शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

टोमॅटो पिकावर विषाणूंचा हल्ला

By admin | Updated: June 15, 2016 04:47 IST

वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला

मंचर : वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, महागड्या औषधांची फवारणी करून कोणताही फायदा होत नाही़ शेतकऱ्यांच्या अंगावर भांडवल आले आहे. नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोने मागील दोन वर्षे शेतकऱ्यांना मालामाल केले़ यावर्षी मात्र टोमॅटोउत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सुरुवातीस बियाण्यात फसवणूक होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या टोमॅटोबागा अक्षरश: उपटून टाकाव्या लागल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरे टोमॅटो पीक घेतले, मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही.़ टोमॅटोची लागवड झाली की लगेच रोपांची मर सुरू होते़ तसेच निम्मे पीक वाया जाते़पिकाची वाढ होताना व्हायरस अ‍ॅटॅक वाढला आहे़ पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ विषाणूजन्य रोगामुळे टोमॅटोची पाने बारीक होतात़ वाढ खुंटते त्यामुळे टोमॅटो फळ बारीक निघते. अद्याप पाऊस पडला नाही. वातावरणात उष्णता आहे़ यामुळे किडीला व रोगाला पोषक असे वातावरण निर्माण होत आहे़ तालुक्यात सध्या ७ हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो पीक घेतले जात असल्याचा अंदाज आहे़ बहुतेक ठिकाणाच्या टोमॅटो पिकावर याचा परिणाम जाणवत आहे. शेतकरी पीक वाचविण्याचा व जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे़ मात्र, त्याला यश येताना दिसत नाही़ (वार्ताहर)- टोमॅटोला एकरी ४० ते ५० हजार रूपये खर्च येतो़ रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात अजून वाढ झाली आहे़ विशेषत: विषाणूजन्य व्हायरसला अटकाव करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहे़ औषध फवारणी करूनसुद्धा कुठलाही परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झालेले दिसतात़ टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे़ पाऊ स पडला तर मात्र परिस्थिती बदलू शकते़ टोमॅटोवरील व्हायरस अटॅक बऱ्यापैकी नियंत्रणात येईल, असे महेश मोरे यांनी सांगितले़