शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बेबी कॅनॉलच्या पाण्याचा हवेलीला फटका

By admin | Updated: May 25, 2017 02:57 IST

जुना मुठा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा परिसरातील शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कउरुळी कांचन/ कोरेगाव मूळ : जुना मुठा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा परिसरातील शेतकरी व रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जादा पाणी वाहून नेण्याची क्षमता नसतानादेखील दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हवेली तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता आपल्या तालुक्याला पाणी नेण्याचा अट्टहास करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. कालवा सुरू करीत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे जरुरीचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भरावाची दुरुस्ती करणे व कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत खडकवासला पाटबंधारे विभागाने घाईघाईने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सुरुवातीच्या काळात कमी दाबाने पाण्याचा प्रवाह असल्याने पाणी व्यवस्थित हवेली तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोहोचले. काही कालावधीनंतर जॅकवेलच्या पंपांची संख्या वाढविल्याने कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी कालवा परिसरात पाझरू लागले. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन गावांच्या हद्दीमध्ये कालवा कालवा गळतीचे प्रमाण वाढू लागले. त्यातच क्षमतेपेक्षा जादा पाणी कालव्यात सोडल्याने मंगळवारी (दि. २३) लोणी काळभोर येथील तरवडी-रानमळा परिसरात कालवा फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशाच प्रकारे अनेकदा कालव्याच्या गळतीचे प्रकार वारंवार घडत आहेत. या सर्वांची कल्पना शेतकरी व ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला दिली. मात्र पाटबंधारे विभागाकडून त्यावर ठोस कारवाई झाली नाही. बुधवारी (दि. २४) कालव्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आल्याने पुन्हा अनेक ठिकाणी कालव्याचे पाणी नागरी वस्ती, शेतामध्ये व रस्त्यांवर वाहताना दिसत होते. सोरतापवाडी येथील माजी उपसरपंच गणेश चौधरी यांनी सांगितले, की कालव्यामधून जड पाणी सोडण्यात आल्याने गावामध्ये अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. अनेक मजुरांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांना घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व घटनेची माहिती देऊनदेखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.