शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बेबी कॅनॉलच्या पाण्याचा हवेलीला फटका

By admin | Updated: May 25, 2017 02:57 IST

जुना मुठा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा परिसरातील शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कउरुळी कांचन/ कोरेगाव मूळ : जुना मुठा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा परिसरातील शेतकरी व रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जादा पाणी वाहून नेण्याची क्षमता नसतानादेखील दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हवेली तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता आपल्या तालुक्याला पाणी नेण्याचा अट्टहास करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. कालवा सुरू करीत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे जरुरीचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भरावाची दुरुस्ती करणे व कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत खडकवासला पाटबंधारे विभागाने घाईघाईने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सुरुवातीच्या काळात कमी दाबाने पाण्याचा प्रवाह असल्याने पाणी व्यवस्थित हवेली तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोहोचले. काही कालावधीनंतर जॅकवेलच्या पंपांची संख्या वाढविल्याने कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी कालवा परिसरात पाझरू लागले. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन गावांच्या हद्दीमध्ये कालवा कालवा गळतीचे प्रमाण वाढू लागले. त्यातच क्षमतेपेक्षा जादा पाणी कालव्यात सोडल्याने मंगळवारी (दि. २३) लोणी काळभोर येथील तरवडी-रानमळा परिसरात कालवा फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशाच प्रकारे अनेकदा कालव्याच्या गळतीचे प्रकार वारंवार घडत आहेत. या सर्वांची कल्पना शेतकरी व ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला दिली. मात्र पाटबंधारे विभागाकडून त्यावर ठोस कारवाई झाली नाही. बुधवारी (दि. २४) कालव्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आल्याने पुन्हा अनेक ठिकाणी कालव्याचे पाणी नागरी वस्ती, शेतामध्ये व रस्त्यांवर वाहताना दिसत होते. सोरतापवाडी येथील माजी उपसरपंच गणेश चौधरी यांनी सांगितले, की कालव्यामधून जड पाणी सोडण्यात आल्याने गावामध्ये अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. अनेक मजुरांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांना घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व घटनेची माहिती देऊनदेखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.