शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘‘बा अन् आय दोघं कचरा वेचतात’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:29 IST

सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय

पुणे : सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय आणि अश्विनीच्या आई-वडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जिवापाड कष्ट केले. कचरा गोळा करून यादोन्ही पालकांनी मोठ्या हिमतीने आपल्या मुलांना शिकवत उज्ज्वल भविष्याची आस त्यांच्या मनात तेवत ठेवली आहे.नुकत्याच बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात विजयने ८९ टक्के तर अश्विनीने ५५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोघांच्या आई-वडिलांना जेव्हा आपल्या मुलांच्या निकालाची बातमी कळली, त्या वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.विजयचे वडील पवनानगर (धनकवडी ) येथे राहतात. त्यांच्याकडे एक स्वत:ची गाडी असून, तिचा उपयोग ते कचरा भरण्यासाठी करतात. सकाळी उठायचं, मिनिडोअर गाडी काढायची, आणि परिसरातील घरांमध्ये जायचे. तिथला कचरा घ्यायचा. तो गाडीत टाकायचा. हे दिवसभरातले काम. महिन्याला एका घराला ५0 रुपये मिळतात. अशी २५0 घरे आहेत. विजयने सुरुवातीपासूनच स्वअध्ययनावर भर दिला. त्याच्या अंगी मुळातच हुशारी होती. त्यामुळे त्याला वेगळ्या शिकवणुकीची गरज पडली नाही. महाविद्यालयात जे काही शिकवले जायचे, त्यावरच लक्ष केंद्रित करून त्याने अभ्यास केला. आपले आईवडील काय करतात याची जाणीव त्याला असल्याने जसे शक्य होईल त्यानुसार अभ्यास करण्यावर विजयने भर दिला. विशेष म्हणजे अकरावीच्या वर्गातदेखील विजय पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. विजयचे वडील सांगतात, ‘‘मला पण मोठा सरकारी अधिकारी व्हायचे होते. परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. घरची गरिबी, अभ्यासाला पुस्तके नाही. तशा अवस्थेतदेखील दहावीपर्यंत मजल मारली. आता विजयला पुढे शिकवायचे आहे. त्याची जिद्द मोठी आहे. कष्ट करण्याची तयारी आहे.’’ विजयने या वेळी सुटीच्याकाळात पुढील शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी नारळपाण्याचा स्टॉल सुरू केला. २ महिने त्याने ते काम करून पैसे जोडले. साक्षी नाडेहिचे आईवडील देखील कचरावेचक असून तिनेदेखील अथकप्रयत्नाने बारावीला ८१ टक्के गुण प्राप्त केले आहे.आई आणि वडील या दोघांना जेवढं शक्य होतं त्या बळावर ते आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टांना उत्तरायी होण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी करावी लागेल. वडिलांचे स्वप्न सरकारी अधिकारी व्हायचे होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. बारावीपर्यंत कुठल्या क्लासेसची गरज पडली नाही. स्वअध्ययनावर भर होता. पुढे तर मदतीची अपेक्षा आहेच. तसे झाल्यास स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणखी वाढेल.- विजय कदमअश्विनीचे आईवडीलदेखील कचरावेचक आहेत. ती वारजे माळवाडी येथील रामनगर येथे राहते. वडील विलास निर्मळ यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले. वास्तविक वह्या, पुस्तके यांसारख्या इतर विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कराव्या लागणाºया जीवघेण्या संघर्षाची कल्पना अश्विनीला आहे. पुढील शिक्षणाला काही मदत झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर पदवीधर होऊन आईवडिलांना हातभार लावेल.- भावना अश्विनी

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८