शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

‘‘बा अन् आय दोघं कचरा वेचतात’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:29 IST

सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय

पुणे : सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय आणि अश्विनीच्या आई-वडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जिवापाड कष्ट केले. कचरा गोळा करून यादोन्ही पालकांनी मोठ्या हिमतीने आपल्या मुलांना शिकवत उज्ज्वल भविष्याची आस त्यांच्या मनात तेवत ठेवली आहे.नुकत्याच बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात विजयने ८९ टक्के तर अश्विनीने ५५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोघांच्या आई-वडिलांना जेव्हा आपल्या मुलांच्या निकालाची बातमी कळली, त्या वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.विजयचे वडील पवनानगर (धनकवडी ) येथे राहतात. त्यांच्याकडे एक स्वत:ची गाडी असून, तिचा उपयोग ते कचरा भरण्यासाठी करतात. सकाळी उठायचं, मिनिडोअर गाडी काढायची, आणि परिसरातील घरांमध्ये जायचे. तिथला कचरा घ्यायचा. तो गाडीत टाकायचा. हे दिवसभरातले काम. महिन्याला एका घराला ५0 रुपये मिळतात. अशी २५0 घरे आहेत. विजयने सुरुवातीपासूनच स्वअध्ययनावर भर दिला. त्याच्या अंगी मुळातच हुशारी होती. त्यामुळे त्याला वेगळ्या शिकवणुकीची गरज पडली नाही. महाविद्यालयात जे काही शिकवले जायचे, त्यावरच लक्ष केंद्रित करून त्याने अभ्यास केला. आपले आईवडील काय करतात याची जाणीव त्याला असल्याने जसे शक्य होईल त्यानुसार अभ्यास करण्यावर विजयने भर दिला. विशेष म्हणजे अकरावीच्या वर्गातदेखील विजय पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. विजयचे वडील सांगतात, ‘‘मला पण मोठा सरकारी अधिकारी व्हायचे होते. परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. घरची गरिबी, अभ्यासाला पुस्तके नाही. तशा अवस्थेतदेखील दहावीपर्यंत मजल मारली. आता विजयला पुढे शिकवायचे आहे. त्याची जिद्द मोठी आहे. कष्ट करण्याची तयारी आहे.’’ विजयने या वेळी सुटीच्याकाळात पुढील शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी नारळपाण्याचा स्टॉल सुरू केला. २ महिने त्याने ते काम करून पैसे जोडले. साक्षी नाडेहिचे आईवडील देखील कचरावेचक असून तिनेदेखील अथकप्रयत्नाने बारावीला ८१ टक्के गुण प्राप्त केले आहे.आई आणि वडील या दोघांना जेवढं शक्य होतं त्या बळावर ते आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टांना उत्तरायी होण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी करावी लागेल. वडिलांचे स्वप्न सरकारी अधिकारी व्हायचे होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. बारावीपर्यंत कुठल्या क्लासेसची गरज पडली नाही. स्वअध्ययनावर भर होता. पुढे तर मदतीची अपेक्षा आहेच. तसे झाल्यास स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणखी वाढेल.- विजय कदमअश्विनीचे आईवडीलदेखील कचरावेचक आहेत. ती वारजे माळवाडी येथील रामनगर येथे राहते. वडील विलास निर्मळ यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले. वास्तविक वह्या, पुस्तके यांसारख्या इतर विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कराव्या लागणाºया जीवघेण्या संघर्षाची कल्पना अश्विनीला आहे. पुढील शिक्षणाला काही मदत झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर पदवीधर होऊन आईवडिलांना हातभार लावेल.- भावना अश्विनी

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८