शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘‘बा अन् आय दोघं कचरा वेचतात’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:29 IST

सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय

पुणे : सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय आणि अश्विनीच्या आई-वडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जिवापाड कष्ट केले. कचरा गोळा करून यादोन्ही पालकांनी मोठ्या हिमतीने आपल्या मुलांना शिकवत उज्ज्वल भविष्याची आस त्यांच्या मनात तेवत ठेवली आहे.नुकत्याच बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात विजयने ८९ टक्के तर अश्विनीने ५५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोघांच्या आई-वडिलांना जेव्हा आपल्या मुलांच्या निकालाची बातमी कळली, त्या वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.विजयचे वडील पवनानगर (धनकवडी ) येथे राहतात. त्यांच्याकडे एक स्वत:ची गाडी असून, तिचा उपयोग ते कचरा भरण्यासाठी करतात. सकाळी उठायचं, मिनिडोअर गाडी काढायची, आणि परिसरातील घरांमध्ये जायचे. तिथला कचरा घ्यायचा. तो गाडीत टाकायचा. हे दिवसभरातले काम. महिन्याला एका घराला ५0 रुपये मिळतात. अशी २५0 घरे आहेत. विजयने सुरुवातीपासूनच स्वअध्ययनावर भर दिला. त्याच्या अंगी मुळातच हुशारी होती. त्यामुळे त्याला वेगळ्या शिकवणुकीची गरज पडली नाही. महाविद्यालयात जे काही शिकवले जायचे, त्यावरच लक्ष केंद्रित करून त्याने अभ्यास केला. आपले आईवडील काय करतात याची जाणीव त्याला असल्याने जसे शक्य होईल त्यानुसार अभ्यास करण्यावर विजयने भर दिला. विशेष म्हणजे अकरावीच्या वर्गातदेखील विजय पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. विजयचे वडील सांगतात, ‘‘मला पण मोठा सरकारी अधिकारी व्हायचे होते. परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. घरची गरिबी, अभ्यासाला पुस्तके नाही. तशा अवस्थेतदेखील दहावीपर्यंत मजल मारली. आता विजयला पुढे शिकवायचे आहे. त्याची जिद्द मोठी आहे. कष्ट करण्याची तयारी आहे.’’ विजयने या वेळी सुटीच्याकाळात पुढील शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी नारळपाण्याचा स्टॉल सुरू केला. २ महिने त्याने ते काम करून पैसे जोडले. साक्षी नाडेहिचे आईवडील देखील कचरावेचक असून तिनेदेखील अथकप्रयत्नाने बारावीला ८१ टक्के गुण प्राप्त केले आहे.आई आणि वडील या दोघांना जेवढं शक्य होतं त्या बळावर ते आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टांना उत्तरायी होण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी करावी लागेल. वडिलांचे स्वप्न सरकारी अधिकारी व्हायचे होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. बारावीपर्यंत कुठल्या क्लासेसची गरज पडली नाही. स्वअध्ययनावर भर होता. पुढे तर मदतीची अपेक्षा आहेच. तसे झाल्यास स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणखी वाढेल.- विजय कदमअश्विनीचे आईवडीलदेखील कचरावेचक आहेत. ती वारजे माळवाडी येथील रामनगर येथे राहते. वडील विलास निर्मळ यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले. वास्तविक वह्या, पुस्तके यांसारख्या इतर विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कराव्या लागणाºया जीवघेण्या संघर्षाची कल्पना अश्विनीला आहे. पुढील शिक्षणाला काही मदत झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर पदवीधर होऊन आईवडिलांना हातभार लावेल.- भावना अश्विनी

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८