शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, देश-विदेशातील कॉन्स्टिट्यूशन्सचे व्यासंगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:12 IST

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ एका केंद्रीय मंत्री - काकासाहेब गाडगीळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्या वेळेला बॅरिस्टर होणे हा ...

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ एका केंद्रीय मंत्री - काकासाहेब गाडगीळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्या वेळेला बॅरिस्टर होणे हा एक पैसे कमावण्याचा मार्ग होता. परंतु बरेचसे बॅरिस्टर पैसे कमावण्याच्या हेतूने, परंतु पैसे कमावण्याऐवजी राजकारणामध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये गुंतलेले आपल्याला आढळतात. सुरुवातीच्या काही काळामध्ये विठ्ठलराव बॅरिस्टर होऊन आल्यानंतर वकिली करू लागले होते. काही वेळेला ते मुंबई हायकोर्टामध्ये देखील वकिली करत होते. परंतु त्यांची वकिली जेमतेमच होती. असे असतानादेखील कायद्याचा आणि घटनांचा देश-विदेशातील घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा त्यांचा अभ्यास दांडगा होता.

विठ्ठलरावांनी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध संयुक्त महाराष्ट्रासाठी काकांच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. १९५७ सालामध्ये नानासाहेब गोरे यांनी काकासाहेब गाडगीळ यांचा पराभव केल्यानंतर आणि काकासाहेब गाडगीळ हे वल्लभभाई पटेल यांच्या गोटात असल्यामुळे नेहरूंना ते नको होते. म्हणून नेहरूंनी त्यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली. नंतर हळूहळू काकासाहेब गाडगीळ यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. आणि १९६६ मध्ये काकासाहेब गाडगीळ यांचे निधन झाले. नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांना राज्यसभेचे सभासद नियुक्त करण्यात आले.

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ राज्यसभेचे खासदार झालेले होते. नंतर मात्र पुण्यामधून ते निवडून लोकसभेवर काँग्रेस पक्षातर्फे आले. १९७६ सालामध्ये आणीबाणी असल्यामुळे आणीबाणी उठल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत मात्र बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव झाला आणि मोहन धारिया निवडून आले. विठ्ठलराव वकील होते. पण त्यांचा देश-विदेशातील घटनांचा अभ्यास चालू होता. त्यानंतर मात्र विठ्ठलराव गाडगीळ पुणे मतदारसंघातून लोकसभेला पाच वेळा निवडून गेले. ही एक हॅट्ट्रिक होती. इतिहास त्यांनी निर्माण केला.

माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी फार मोठी कामगिरी केली. १९७२ मध्ये त्यांनी दूरदर्शन सुरू केले. अतिशय अभ्यासू खासदार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत होती. नेहमी पार्लमेंटच्या लायब्ररीत बसून टिपणे काढणे आणि अभ्यासपूर्ण माहिती आणि उत्तरे देणे यामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा हातखंडा होता. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा जगामधल्या कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये गाढा अभ्यास होता. म्हणून त्यांनी संसद मार्ग लोकशाहीचा मार्ग हा ग्रंथ लिहिला. विविध घटनांचे विवेचन आणि विश्लेषण करण्यात विठ्ठलरावाचा हातखंडा होता. ज्या ज्या वेळेला घटनेच्या संदर्भामध्ये एखादा पेचप्रसंग निर्माण होत असे, त्या वेळेला बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ नेमका सल्ला देत.

इंदिरा गांधींच्या खुनानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ माहिती आणि प्रसारण मंत्री होते. इंदिरा गांधींना अटक झाल्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलरावांनी नाना पेठेतून लक्ष्मी रोडने निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर मात्र एकदम नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री झाले.

नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते झाले. त्यांच्या पत्रकार परिषदा अतिशय गाजलेल्या, अभ्यासपूर्ण असायच्या. आदर्श पत्रकार परिषदा कशाला म्हणावं, तर त्या विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पत्रकार परिषदा होय. खरा संसदपटू, नर्मविनोदकार, अभ्यासू खासदार, लोकप्रिय मंत्री, दूरदर्शन सुरू करणारा मंत्री आणि घटनात्मक पेच सोडवताना सल्ला देणारा काँग्रेसचा नेता २५ फेब्रुवारी २००१ मध्ये कालवश झाला. त्यामुळे देशोदेशींचा घटनात्मक अभ्यासक गेल्याची खंत काँग्रेसमधल्या जाणकारांना आहे.

बऱ्याच वेळेला डेक्कन क्वीनने मुंबईला जाताना बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि मी एकत्रच प्रवास केलेला आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ माहिती आणि प्रसारण मंत्री असताना दिल्लीमध्ये वीज यांच्या घरी राहिलेलो आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते नवयुग समाचार या माझ्या पत्नीने चालविलेल्या सायंदैनिकाचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे.

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा २५ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यांना भावांजली.

- ॲड. बाबूराव कानडे