शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमध्ये जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST

वालचंदनगर : इंदापूरचे हक्काचे पाणी रद्द करण्यात आले. उजनी धरण निमार्णासाठी हजारो एकर जमीन देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ...

वालचंदनगर : इंदापूरचे हक्काचे पाणी रद्द करण्यात आले. उजनी धरण निमार्णासाठी हजारो एकर जमीन देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या सरकारचा शेतकरी कृती समितीच्या वतीने जागरण गोंधळ घालून जाहीर निषेध करत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कळंबा ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांनी दिली.

सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणा-या नीरा नदीवरील कळंबोलीच्या पुलावर अनेक शेतकरी व युवकांनी आंदोलन करीत पाणी रद्द आदेशाचा निषेध केला व रस्त्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. कळंब ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकऱ्यांनी जागरण गोधंळ घालून रास्ता रोको आंदोलन केले. कळंब वालचंदनगर परिसरातील युवकांनी नीरा नदीच्या पुलावर ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या अनोख्या आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला. यामध्ये ‘सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना न्याय मिळू दे’ असे देवाला साकडे घातले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या पाण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली. यावेळी अतुल सावंत, संदीप पाटील, महेश बोंद्रे, संजय खरात, देविदास केदार, पंकज डोंबाळे, विनोद वरुडकर, गणेश लंबाते, सागर खरात, बबलू लकडे, संजय निटवे, भालचंद्र काटकर आदी युवा शेतकरी उपस्थित होते.

-------------------------

फोटो ओळी : कळंबोली येथील नीरा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ घालत युवा शेतक-यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी आदेश रद्द केल्याबद्दल आंदोलन केले.

२१०५२०२१-बारामती-१८

------------------------