शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कळंबमध्ये जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST

वालचंदनगर : इंदापूरचे हक्काचे पाणी रद्द करण्यात आले. उजनी धरण निमार्णासाठी हजारो एकर जमीन देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ...

वालचंदनगर : इंदापूरचे हक्काचे पाणी रद्द करण्यात आले. उजनी धरण निमार्णासाठी हजारो एकर जमीन देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या सरकारचा शेतकरी कृती समितीच्या वतीने जागरण गोंधळ घालून जाहीर निषेध करत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कळंबा ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांनी दिली.

सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणा-या नीरा नदीवरील कळंबोलीच्या पुलावर अनेक शेतकरी व युवकांनी आंदोलन करीत पाणी रद्द आदेशाचा निषेध केला व रस्त्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. कळंब ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकऱ्यांनी जागरण गोधंळ घालून रास्ता रोको आंदोलन केले. कळंब वालचंदनगर परिसरातील युवकांनी नीरा नदीच्या पुलावर ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या अनोख्या आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला. यामध्ये ‘सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना न्याय मिळू दे’ असे देवाला साकडे घातले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या पाण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली. यावेळी अतुल सावंत, संदीप पाटील, महेश बोंद्रे, संजय खरात, देविदास केदार, पंकज डोंबाळे, विनोद वरुडकर, गणेश लंबाते, सागर खरात, बबलू लकडे, संजय निटवे, भालचंद्र काटकर आदी युवा शेतकरी उपस्थित होते.

-------------------------

फोटो ओळी : कळंबोली येथील नीरा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ घालत युवा शेतक-यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी आदेश रद्द केल्याबद्दल आंदोलन केले.

२१०५२०२१-बारामती-१८

------------------------