शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

‘बंद’ टाळावेत!

By admin | Updated: June 15, 2014 04:15 IST

शासन आणि समाज यांच्या समन्वयातून आंदोलनासंदर्भात निर्णय झाला पाहिजे; मात्र या निर्णयातून समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी होता कामा नये

दौंड : शासन आणि समाज यांच्या समन्वयातून आंदोलनासंदर्भात निर्णय झाला पाहिजे; मात्र या निर्णयातून समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी होता कामा नये. यासाठी विविध राजकीय पक्षांनी तसेच संघटनांनी आंदोलनात्मक भाग म्हणून शहर बंद करण्याचे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले. दौंड येथे शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. फेसबुकवर राष्ट्रीय पुरुषांचा अवमान करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. राष्ट्रीय पुरुषांचा अवमान होणे ही बाब अशोभनीय आहे. तर, राजकीय आणि सामाजिक संस्थांनी अफवावर विश्वास ठेवू नये. तातडीने सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती यांची समिती नेमण्यात येणार असून, ती शहर बंदबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे शेवटी शिंगटे म्हणाले. पोलीस निरीक्षक सजन हंकारे म्हणाले, की निषेध करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत; मात्र गाव बंद ठेवून काही साधले जात नाही. याउलट, तणाव निर्माण होऊन हातावर पोट असलेल्या मजुरांचे नुकसान होते. तसेच, अडीअडचणींना बंदच्या काळात समाजातील विविध घटकांना सामोरे जावे लागते. याचा विचार राजकीय पक्ष आणि संघटनांनी करावा, असे शेवटी ते म्हणाले. या वेळी भास्कर सोनवणे, राजेंद्र ओझा, राजेंद खटी, आबा वाघमारे, भारत सरोदे, बादशहा शेख, विकास कदम, राजू बारवकर, सचिन कुलथे, रवी कुलकर्णी, सुनील शर्मा, छगन परमार यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार उत्तम दिघे यांनी आभार मानले. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)