शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

‘बंद’ टाळावेत!

By admin | Updated: June 15, 2014 04:15 IST

शासन आणि समाज यांच्या समन्वयातून आंदोलनासंदर्भात निर्णय झाला पाहिजे; मात्र या निर्णयातून समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी होता कामा नये

दौंड : शासन आणि समाज यांच्या समन्वयातून आंदोलनासंदर्भात निर्णय झाला पाहिजे; मात्र या निर्णयातून समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी होता कामा नये. यासाठी विविध राजकीय पक्षांनी तसेच संघटनांनी आंदोलनात्मक भाग म्हणून शहर बंद करण्याचे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले. दौंड येथे शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. फेसबुकवर राष्ट्रीय पुरुषांचा अवमान करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. राष्ट्रीय पुरुषांचा अवमान होणे ही बाब अशोभनीय आहे. तर, राजकीय आणि सामाजिक संस्थांनी अफवावर विश्वास ठेवू नये. तातडीने सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती यांची समिती नेमण्यात येणार असून, ती शहर बंदबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे शेवटी शिंगटे म्हणाले. पोलीस निरीक्षक सजन हंकारे म्हणाले, की निषेध करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत; मात्र गाव बंद ठेवून काही साधले जात नाही. याउलट, तणाव निर्माण होऊन हातावर पोट असलेल्या मजुरांचे नुकसान होते. तसेच, अडीअडचणींना बंदच्या काळात समाजातील विविध घटकांना सामोरे जावे लागते. याचा विचार राजकीय पक्ष आणि संघटनांनी करावा, असे शेवटी ते म्हणाले. या वेळी भास्कर सोनवणे, राजेंद्र ओझा, राजेंद खटी, आबा वाघमारे, भारत सरोदे, बादशहा शेख, विकास कदम, राजू बारवकर, सचिन कुलथे, रवी कुलकर्णी, सुनील शर्मा, छगन परमार यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार उत्तम दिघे यांनी आभार मानले. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)