शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

भीमा खोऱ्यांतील धरणांवर स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

अतिवृष्टी, धरणाच्या पाणीपातळीची संगणकावर मिळणार अचूक माहिती भाग - २ पुणे : भीमा खोऱ्यातील नद्यांवर पूरपरिस्थिती उद्भवू नये. यासाठी ...

अतिवृष्टी, धरणाच्या पाणीपातळीची संगणकावर मिळणार अचूक माहिती

भाग - २

पुणे : भीमा खोऱ्यातील नद्यांवर पूरपरिस्थिती उद्भवू नये. यासाठी खोऱ्यातील सर्वच धरणांवर स्वयंचलित रेनगेट स्टेशन (ऑटोमॅटिक रेनगेट स्टेशन) उभारण्यात येणार आहे. धरणाच्या कॅचमेन्ट भागात पडणारा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी आणि धरणाची पाणीपातळी याची अचूक माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यालयात संगणकावर मिळणार आहे. त्यामुळे आता धरणावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याची गरज भासणार नाही. येत्या वर्षभरात सर्वच धरणांवर हे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कृष्णा खोऱ्यातील पूरपरिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा १० दिवस पाण्याखाली होता. या जिल्ह्यातील शेतीबरोबरच घरे, जनावरे, इतर स्थावर मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी वडणेरे समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार कृष्णा खोऱ्यातील ४० धरणांवर तातडीने स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर भीमा खोऱ्यातील धरणांवर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

---

ढगफुटीचीही कारणे शोधणार

मागील काही वर्षांत राज्यातील अनेक भागात ढगफुटीच्या घटना घडत आहेत. पुणे शहरातही ढगफुटी झाल्यामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच काही नागरिकांचा जीव गेला. त्याचबरोबर इतरही मोठे नुकसान झाले होते. असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यामुळे विशिष्ट भागात होणाऱ्या ढगफुटीचा देखील अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच त्यावर तातडीने काय उपाय योजायचे हे देखील पाहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---

सॅटेलाईट इमेजचा वापर करून पूर अंदाज बांधणार

मोठ्या शहरात अतिवृष्टी कुठे होणार, याचा अचूक अंदाज यावा यासाठी मुंबईतील सांताक्रूझ, दादर आणि नरिमन पॉइंट येथे डॉप्लर रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याच्या अगोदर याची अचूक माहिती मिळत आहे. तसेच भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रात आणि नदीच्या प्रवाहाच्या मार्गावर भारतीय हवामान विभागाच्या साहाय्याने सॅटेलाईट इमेजचा वापर करून ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर अंदाज माहिती उपलब्ध होणार आहे. त्यातून आधीच उपाययोजना करता येणार आहेत.

---

५० वर्षांतील पर्जन्यमान तपासणार

गेल्या ४०-५० वर्षांत महाराष्ट्रातील पर्जन्यमान कसे होते, त्यात कसा बदल होत गेला, कसे कमी झाला. कारण १९९६, २००५ आणि २००६ या काळात अतिवृष्टीमुळे उजनी धरण पूर्ण भरल्याने खालच्या भागात पूरसदृश परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे प्रामुख्याने भीमा खोऱ्यातील पर्जन्यमानाचा अभ्यास करण्यात येणार आहे सध्या जलसंपदा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. पुण्यातील सिंचन भवन येथून याबाबतच्या सर्व कामाच्या बाबतीत आणि दळणवळणाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.