शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

भीमा खोऱ्यांतील धरणांवर स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

अतिवृष्टी, धरणाच्या पाणीपातळीची संगणकावर मिळणार अचूक माहिती भाग - २ पुणे : भीमा खोऱ्यातील नद्यांवर पूरपरिस्थिती उद्भवू नये. यासाठी ...

अतिवृष्टी, धरणाच्या पाणीपातळीची संगणकावर मिळणार अचूक माहिती

भाग - २

पुणे : भीमा खोऱ्यातील नद्यांवर पूरपरिस्थिती उद्भवू नये. यासाठी खोऱ्यातील सर्वच धरणांवर स्वयंचलित रेनगेट स्टेशन (ऑटोमॅटिक रेनगेट स्टेशन) उभारण्यात येणार आहे. धरणाच्या कॅचमेन्ट भागात पडणारा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी आणि धरणाची पाणीपातळी याची अचूक माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यालयात संगणकावर मिळणार आहे. त्यामुळे आता धरणावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याची गरज भासणार नाही. येत्या वर्षभरात सर्वच धरणांवर हे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कृष्णा खोऱ्यातील पूरपरिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा १० दिवस पाण्याखाली होता. या जिल्ह्यातील शेतीबरोबरच घरे, जनावरे, इतर स्थावर मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी वडणेरे समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार कृष्णा खोऱ्यातील ४० धरणांवर तातडीने स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर भीमा खोऱ्यातील धरणांवर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

---

ढगफुटीचीही कारणे शोधणार

मागील काही वर्षांत राज्यातील अनेक भागात ढगफुटीच्या घटना घडत आहेत. पुणे शहरातही ढगफुटी झाल्यामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच काही नागरिकांचा जीव गेला. त्याचबरोबर इतरही मोठे नुकसान झाले होते. असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यामुळे विशिष्ट भागात होणाऱ्या ढगफुटीचा देखील अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच त्यावर तातडीने काय उपाय योजायचे हे देखील पाहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---

सॅटेलाईट इमेजचा वापर करून पूर अंदाज बांधणार

मोठ्या शहरात अतिवृष्टी कुठे होणार, याचा अचूक अंदाज यावा यासाठी मुंबईतील सांताक्रूझ, दादर आणि नरिमन पॉइंट येथे डॉप्लर रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याच्या अगोदर याची अचूक माहिती मिळत आहे. तसेच भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रात आणि नदीच्या प्रवाहाच्या मार्गावर भारतीय हवामान विभागाच्या साहाय्याने सॅटेलाईट इमेजचा वापर करून ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर अंदाज माहिती उपलब्ध होणार आहे. त्यातून आधीच उपाययोजना करता येणार आहेत.

---

५० वर्षांतील पर्जन्यमान तपासणार

गेल्या ४०-५० वर्षांत महाराष्ट्रातील पर्जन्यमान कसे होते, त्यात कसा बदल होत गेला, कसे कमी झाला. कारण १९९६, २००५ आणि २००६ या काळात अतिवृष्टीमुळे उजनी धरण पूर्ण भरल्याने खालच्या भागात पूरसदृश परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे प्रामुख्याने भीमा खोऱ्यातील पर्जन्यमानाचा अभ्यास करण्यात येणार आहे सध्या जलसंपदा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. पुण्यातील सिंचन भवन येथून याबाबतच्या सर्व कामाच्या बाबतीत आणि दळणवळणाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.