शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

माजी सरन्यायाधीशांकडून न्याय व्यवस्थेमधील सत्य सांगण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेले विधान अत्यंत धक्कादायक असून सद्यस्थितीतील न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेले विधान अत्यंत धक्कादायक असून सद्यस्थितीतील न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा हा प्रयत्न तर नाही ना हे मला ठाऊक नाही. परंतु, या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुण्यात सुरू असलेल्या ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ‘देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाल्याचे तसेच न्यायालयात न्याय मिळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. न्यायालयात तुमचेच मळलेले कपडे धूत बसावे लागते. त्यामुळे तेथे न्याय मिळत नाही असेही त्यांनी नमूद केले होते. गोगोई यांच्या विधानामुळे न्याय व्यवस्थेवरील चर्चेला तोंड फुटले आहे. याविषयी पवार यांना विचारले असता त्यांनी नागरिकांच्या मनात चिंता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली.

यासोबतच, राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण तसेच मंत्री धनंजय मुंडे लैंगिक अत्याचार तक्रार प्रकरणी शरद पवार गप्प का आहेत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. याविषयी पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना आपले गाव सोडून बाहेर दुसरीकडे जावे लागते अशा लोकांबद्दल मी बोलायचे का? त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असे म्हणत पाटलांना चिमटा काढला.