शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

पालखी सोहळ्यात ‘अश्व’ वैभव

By admin | Updated: July 7, 2015 02:57 IST

श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसह त्यामधील लवाजम्यामुळे सोहळ्याला तितकीच भव्यता प्राप्त झाली आहे.

मंगेश पांडे पिंपरीश्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसह त्यामधील लवाजम्यामुळे सोहळ्याला तितकीच भव्यता प्राप्त झाली आहे. याच सोहळ्यातील अश्व म्हणजे सोहळ्यातील वैभवतेचे प्रतीक मानले जाते. आषाढी वारीसाठी पंढरीला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात काळानुरूप बदल होत गेले. सुरुवातीला काही भाविकांसह पालखी पंढरीला नेली जात होती. चौघडागाडी, चोपदार, अश्व, हत्ती असा लवाजमा वाढत गेला. सोहळा अधिकाधिक भव्य कसा होईल, यासाठी संस्थानने पावले उचलली. सोहळ्यात सहभागी होत असलेल्या अश्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्व म्हणजे वैभवतेचे प्रतीक मानले जाते. सध्या सोहळ्यातही दोन अश्व आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पेठ बाभूळगाव येथील अश्व आहे. परंपरेप्रमाणे अनेक वर्षांपासून हा अश्व सोहळ्यात आहे. यावर तुकाराममहाराज स्वार असल्याचे मानले जाते. हा अश्व विनायक रणेर-बाभूळगावकर यांच्या मालकीचा असून, ते हा अश्व घेऊन येतात. यापूर्वी त्यांचे वडील नारायण रणेर घेऊन येत. पूर्वी हा अश्व बाभूळगावहून देहूला पायी आणला जात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बाभूळगाव ते पंढरपूरपर्यंत अश्व वाहनाने आणतात. त्यानंतर पंढरपूरहून देहूपर्यंत हा अश्व पायी आणला जातो. अश्वासोबतच बाभूळगावातील माई दिंडीतील भाविक असतात. प्रस्थान सोहळ्याच्या बारा दिवस अगोदर अश्व व माई दिंडी पंढरपूरहून देहूकडे मार्गस्थ होतात. परंपरेनुसार अनेक वर्षांपासून बाभूळगावकरांचा अश्व सोहळ्यात सेवा देत आहे. तुकोबाराय स्वार असल्याचे मानले जात असल्याने या अश्वाला ‘देवाचा अश्व’ असेही संबोधले जाते. या सोहळ्यात आतापर्यंत चार अश्व झाले. वयोमानानुसार ठरावीक कालावधीनंतर अश्व बदलण्यात आले. विशेष म्हणजे बाभूळगावकरांनी चारही अश्वांचे नाव ‘राजा’ हेच ठेवले. सध्याच्या अश्वाचे नावही ‘राजा’च आहे. सोहळ्यातील दुसरा अश्व अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांचा असतो. १९८३पासून हा अश्व सोहळ्यात दाखल झाला. दोन्ही अश्व प्रस्थान सोहळ्याच्या आदल्या दिवशी देहूत दाखल होतात.