शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आशा भोसले म्हणतात...देवानं आणखी पन्नास वर्षे दिली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST

पुणे : ‘देवानं मला आणखी पन्नास वर्षांचं आयुष्य दिलं तर त्यातली २५ वर्षं मी बाबासाहेबांना देईन,’ असं म्हणत रसिकांच्या ...

पुणे : ‘देवानं मला आणखी पन्नास वर्षांचं आयुष्य दिलं तर त्यातली २५ वर्षं मी बाबासाहेबांना देईन,’ असं म्हणत रसिकांच्या आवडत्या आशाताई भोसले यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलचा स्नेह व्यक्त केला. ‘मागे उभा मंगेश, पुढा उभा मंगेश’ या गीताच्या ओळी आशाताईंनी त्यांच्या चिरतरुण स्वरात बाबासाहेबांसाठी सादर केल्या. बाबासाहेबांच्या मिश्कील स्वभावाचा किस्साही यावेळी आशाताईंनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘एकदा लतादीदीने बाबासाहेबांना विचारले की, कोणाचा आवाज तुम्हाला जास्त आवडतो?’ तेव्हा लता, आशा किंवा उषा यांच्यातल्या कोणाचंही नाव घेतलं तर अडचण होईल. म्हणून बाबासाहेबांनी ‘कपबश्यांचा’ असे उत्तर देत स्वत:ची सुटका करून घेतल्याचा प्रसंग सांगताना आशाताईंना या वयातही हसू आवरलं नाही.

निमित्त होते बाबासाहेबांच्या शतकी पदार्पणाचे. ‘जीवनगाणी’, ‘जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘स्वरगंधार’ या संस्थांनी पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी स्वत: नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

‘सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती येथे आहे, ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे,” असा आदरभाव आशाताईंनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंड आणि नंदी आजही माझ्या घरात आहे. या पिंडीने माझे आयुष्य समृद्ध केले आहे. मी नेहमीच मोगऱ्याच्या फुलासारखे टवटवीत राहाण्याचा आणि मन स्वच्छ मन ठेवण्याचा प्रयत्न करते. बाबासाहेबांनी खूप भरभरून प्रेम दिले दिले....” या नंतर त्यांनी ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’ आणि ‘चंदनाची चोळी अंग अंग पोळी’ या अभंगांच्या ओळी गायल्या.

गजानन मेहेंदळे म्हणाले, “बाबासाहेब हे फक्त ‘शिवशाहीर’ नाहीत तर इतिहास संशोधक देखील आहेत. मात्र, त्यांची ‘संशोधक’ ही ओळख झाकोळली गेली आहे.” सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणाले, “शिवाजी महाराजांची गोडी मला वडिलांमुळे लागली. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम आणि कार्य मला नेहमीच भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावासा वाटते.” श्रीराम केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मंदार कर्णिक यांनी आभार मानले.