शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

आशा भोसले म्हणतात...देवानं आणखी पन्नास वर्षे दिली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST

पुणे : ‘देवानं मला आणखी पन्नास वर्षांचं आयुष्य दिलं तर त्यातली २५ वर्षं मी बाबासाहेबांना देईन,’ असं म्हणत रसिकांच्या ...

पुणे : ‘देवानं मला आणखी पन्नास वर्षांचं आयुष्य दिलं तर त्यातली २५ वर्षं मी बाबासाहेबांना देईन,’ असं म्हणत रसिकांच्या आवडत्या आशाताई भोसले यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलचा स्नेह व्यक्त केला. ‘मागे उभा मंगेश, पुढा उभा मंगेश’ या गीताच्या ओळी आशाताईंनी त्यांच्या चिरतरुण स्वरात बाबासाहेबांसाठी सादर केल्या. बाबासाहेबांच्या मिश्कील स्वभावाचा किस्साही यावेळी आशाताईंनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘एकदा लतादीदीने बाबासाहेबांना विचारले की, कोणाचा आवाज तुम्हाला जास्त आवडतो?’ तेव्हा लता, आशा किंवा उषा यांच्यातल्या कोणाचंही नाव घेतलं तर अडचण होईल. म्हणून बाबासाहेबांनी ‘कपबश्यांचा’ असे उत्तर देत स्वत:ची सुटका करून घेतल्याचा प्रसंग सांगताना आशाताईंना या वयातही हसू आवरलं नाही.

निमित्त होते बाबासाहेबांच्या शतकी पदार्पणाचे. ‘जीवनगाणी’, ‘जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘स्वरगंधार’ या संस्थांनी पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी स्वत: नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

‘सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती येथे आहे, ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे,” असा आदरभाव आशाताईंनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंड आणि नंदी आजही माझ्या घरात आहे. या पिंडीने माझे आयुष्य समृद्ध केले आहे. मी नेहमीच मोगऱ्याच्या फुलासारखे टवटवीत राहाण्याचा आणि मन स्वच्छ मन ठेवण्याचा प्रयत्न करते. बाबासाहेबांनी खूप भरभरून प्रेम दिले दिले....” या नंतर त्यांनी ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’ आणि ‘चंदनाची चोळी अंग अंग पोळी’ या अभंगांच्या ओळी गायल्या.

गजानन मेहेंदळे म्हणाले, “बाबासाहेब हे फक्त ‘शिवशाहीर’ नाहीत तर इतिहास संशोधक देखील आहेत. मात्र, त्यांची ‘संशोधक’ ही ओळख झाकोळली गेली आहे.” सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणाले, “शिवाजी महाराजांची गोडी मला वडिलांमुळे लागली. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम आणि कार्य मला नेहमीच भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावासा वाटते.” श्रीराम केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मंदार कर्णिक यांनी आभार मानले.