शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत कोरोनाचा चढता आलेख; उपाय योजनांमध्ये सातत्य ठेवा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST

पवार यांच्या सूचना कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा बारामती : बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवड्यापेक्षा कोरोनाबाधितांचा चढता आलेख दिसून येत ...

पवार यांच्या सूचना

कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

बारामती : बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवड्यापेक्षा कोरोनाबाधितांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजनांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच, कोणीही हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच, बारामती तालुक्यात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्य:स्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, अँटिजेन तपासणी, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवड्यापेक्षा कोरोनाबाधितांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच, कोणीही हलगर्जीपणा करू नये. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून बारामती शहरात, तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जादा आहे. संसर्ग कशामुळे वाढला, याची माहिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना राबवा. टेस्टिंग व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. हॉटस्पॉट ठिकाणे प्रतिबंधित करण्यात यावीत, जेणे करून कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल. कोरोना संसर्ग इतर ठिकाणी कमी होत आहे. बारामतीमध्ये का कमी होत नाही, त्याची कारणे शोधा व त्यावर उपाययोजना राबवा असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील रिंगरोडची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.