शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राग अन‌् ताल निर्मितीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: रागाचे आरोह आणि अवरोह दिले की, एक बंदिश (एक संगीत रचना) तयार होते आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: रागाचे आरोह आणि अवरोह दिले की, एक बंदिश (एक संगीत रचना) तयार होते आणि पारंपारिक शास्त्रीय शैलीमध्ये त्याचे प्रस्तुतीकरण होते. तसेच आपण तालाचे नाव आणि मात्रांची संख्या दिल्यास त्यानुसार तालाची रचना होते आणि दहा ते पंधरा मिनिटांचा तबला सोलो सादर होतो. हे नक्की काय आहे? असा प्रश्न पडला असेल ना! पुण्याचे फ्लेम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. विनोद विद्वांस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून संगणकीय भारतीय संगीत आणि ताल निर्मिती करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. एक आर्टिफिशियल इंटेलिजेंट क्रिएटिव्ह एक्सपर्ट सिस्टीम तयार होण्याचे काम संगीत विश्वातच नव्हे तर संगणक क्षेत्रातही प्रथमच होत आहे.

प्राध्यापक डॉ. विनोद विद्वांस यांनी पवई आयआयटीमधून पीचडी मिळविली असून, तेथील इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटरचे माजी विद्यार्थी आहेत. जवळपास पंचवीस वर्षं ते या संकल्पनेवर काम करत आहेत. या संशोधनातूनच त्यांनी भरतमुनींची २२ श्रुतींची संकल्पना मांडणारे भरतवीणा नावाचे स्वतंत्र वाद्य डिझाइन केले आहे. या भरतवीणेवर भरतमुनींच्या २२ श्रुती वाजवता येतात. या आर्टिफिशियल इंटेलिजेंट क्रिएटिव्ह एक्सपर्ट सिस्टीम बद्दल डॉ. विद्वांस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलं की, संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरुन ‘संगणक-निर्मित’ भारतीय संगीत किंवा संगणकीय भारतीय संगीत आणि ताल निर्माण होतात का ही शक्यता ताडून बघितली आहे, आणि त्याचे फलित खूपच आश्वासक आहे. या सॉफ्टवेअरमध्ये कोणतीही मानवी मदत न घेता, रागाचे आरोह-अवरोह दिले की संगणक नवीन बंदिश तयार करतो. यामध्ये कुठलाही रागाचा किंवा तालाचा डेटाबेस नाही. यामध्ये हिंदुस्थानी तसेच कर्नाटक संगीतातील राग आणि ताल वाजतात. ही निर्मिती नुकतीच इंडिया इंटर नँशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ२०२०) महोत्सवामध्ये सादर करण्यात आली.

----------------

तज्ज्ञांप्रमाणे करते काम

ही शास्त्रीय प्रणाली भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञाप्रमाणे काम करते. भारतीय संगीताची मूलतत्त्वे, संकल्पना आणि पारंपारिक ज्ञान या प्रणालीमध्ये संगीत निर्मितीसाठी नियमांच्या रुपात एन्कोड केले गेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे ‘जनरेटिव्ह’ सामर्थ्य असल्याचे विद्वांस यांनी सांगितले.