शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा बभ्रा करुन सरकारने रोखल्या नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१८ परीक्षा ४२० पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१८ परीक्षा ४२० पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल लागून दीड वर्ष होत आले तरी राज्य सरकार नियुक्ती देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

राज्यसेवांची जाहिरात १० डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध करण्यात आली. पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारीला तर मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान झाली. अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लावण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला. शासन नियमानुसार तीन महिन्यात नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र राज्य सरकार मराठा आरक्षणाचे कारण पुढे करत नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दि. ९ सप्टेंबर २०२० च्या एसइबीसी संबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसइबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कोणतीही नियुक्ती एसइबीसी आरक्षणानुसार देण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले. या निर्णयामुळे ४२० पैकी एसइबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन उत्तीर्ण झालेल्या ५५ विद्यार्थ्यांच्या नियुक्तीवर स्थगिती आली. परंतु या ५५ विद्यार्थ्यांमुळे इतर संवर्गातील उरलेल्या ३६५ विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कोणतेही कारण न देता सरकारने रखडवल्या आहेत. यामुळे इतर समाजातील विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करीत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

चौकट

न्यायालयाने रोखलेले नाही

९ डिसेंबर २०२० रोजी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने मराठा आरक्षण कायद्यांतर्गत येणाऱ्या नियुक्त्या वगळून इतर नियुक्त्या देण्यास राज्य सरकारला रोखले नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे एसइबीसी व्यतिरिक्त इतर उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे, असे उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तरीदेखील मराठा आरक्षणाचे खोटे कारण पुढे करत सरकारने अन्य समाजाच्या ३६५ उमेदवारांच्या नियुक्त्या रखडवल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.