शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

लाळखुरकत रोगामुळे पशुधारकांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:11 IST

एकाच दिवशी पशुधारकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान डाळज: इंदापूर तालुक्यातील डाळज परिसरामध्ये लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांचा सुरक्षेचा प्रश्न ...

एकाच दिवशी पशुधारकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान

डाळज: इंदापूर तालुक्यातील डाळज परिसरामध्ये लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून डाळज नं. ३ येथील गणेश आबासाहेब जगताप या पशुधारकाच्या गोठ्यातील एका दिवशी एक-दोन नव्हे तर चक्क दहा दुभत्या गायी मरण पावल्या. या परिसरातील पशुधारकांना आपल्या जनावरांची या रोगापासून सुरक्षा कशी करावी हा प्रश्न पडत आहे.

कोविड या रोगामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यातच शेतकरी हा जिद्दीने शेती करत आहे, परंतु शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतीही परवडत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात, परंतु काही दिवसांपासून या व्यवसायाला लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे पशुधारकांना त्रस्त केले आहे. डाळज परिसरात गेल्या काही दिवसांपासून या रोगामुळे जनावरे मरण पावत आहेत. डाळज परिसरात ८ वासरे, १२ दुभती जनावरे मरण पावली असून १५३ जनावरे या रोगाने ग्रस्त असून यावर पशुसंवर्धन विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पशुधन पालकांकडून होत आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, १ सप्टेंबर पासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली असून एखादे जनावर लाळखुरकत रोगाने दगावले असल्यास त्या पशुधारकाला जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे असे सांगितले.

गणेश जगताप, पशुधारक - माझ्या गोठ्यातील गुरांना ताप आला असता पशुवैद्यकाकडून त्यांची तपासणीही करण्यात आली. त्यावर उपचारही केले, परंतु रोगांचे निदान न झाल्याने दहा जनावरे मरण पावले, यामुळे माझे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निराशेच्या गर्तेत आहेत, इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच पशुसंवर्धन खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे व पशुसंवर्धन प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन पशुधारकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली . तसेच यापूर्वी लाळखुरकत या रोगामुळे मोठी जनावरे मरण पावत नव्हती परंतु आताच्या या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांना ताप येऊन अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मोठी जनावरे मरण पावत आहेत.