शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

लाळखुरकत रोगामुळे पशुधारकांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:11 IST

एकाच दिवशी पशुधारकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान डाळज: इंदापूर तालुक्यातील डाळज परिसरामध्ये लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांचा सुरक्षेचा प्रश्न ...

एकाच दिवशी पशुधारकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान

डाळज: इंदापूर तालुक्यातील डाळज परिसरामध्ये लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून डाळज नं. ३ येथील गणेश आबासाहेब जगताप या पशुधारकाच्या गोठ्यातील एका दिवशी एक-दोन नव्हे तर चक्क दहा दुभत्या गायी मरण पावल्या. या परिसरातील पशुधारकांना आपल्या जनावरांची या रोगापासून सुरक्षा कशी करावी हा प्रश्न पडत आहे.

कोविड या रोगामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यातच शेतकरी हा जिद्दीने शेती करत आहे, परंतु शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतीही परवडत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात, परंतु काही दिवसांपासून या व्यवसायाला लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे पशुधारकांना त्रस्त केले आहे. डाळज परिसरात गेल्या काही दिवसांपासून या रोगामुळे जनावरे मरण पावत आहेत. डाळज परिसरात ८ वासरे, १२ दुभती जनावरे मरण पावली असून १५३ जनावरे या रोगाने ग्रस्त असून यावर पशुसंवर्धन विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पशुधन पालकांकडून होत आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, १ सप्टेंबर पासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली असून एखादे जनावर लाळखुरकत रोगाने दगावले असल्यास त्या पशुधारकाला जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे असे सांगितले.

गणेश जगताप, पशुधारक - माझ्या गोठ्यातील गुरांना ताप आला असता पशुवैद्यकाकडून त्यांची तपासणीही करण्यात आली. त्यावर उपचारही केले, परंतु रोगांचे निदान न झाल्याने दहा जनावरे मरण पावले, यामुळे माझे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निराशेच्या गर्तेत आहेत, इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच पशुसंवर्धन खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे व पशुसंवर्धन प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन पशुधारकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली . तसेच यापूर्वी लाळखुरकत या रोगामुळे मोठी जनावरे मरण पावत नव्हती परंतु आताच्या या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांना ताप येऊन अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मोठी जनावरे मरण पावत आहेत.