शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अँटिबॉडी म्हणजे संपूर्ण प्रतिकारशक्ती नव्हे, बिनधास्त वावरणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

कुतूहलापोटी केल्या जाताहेत अँटिबॉडी टेस्ट : कोरोनाची लागण किंवा लसीकरणाला तो केवळ प्रतिसाद???? डमी star 942 पुणे : लसीकरण ...

कुतूहलापोटी केल्या जाताहेत अँटिबॉडी टेस्ट : कोरोनाची लागण किंवा लसीकरणाला तो केवळ प्रतिसाद????

डमी star 942

पुणे : लसीकरण झाल्यानंतर अँटिबॉडी तपासणी करणाऱ्यांबद्दल अनेक नागरिक उत्सुक असल्याचे दिसत आहे. कोरोनाची लागण होऊन गेल्यावर शरीरात कधीपर्यंत अँटिबॉडी राहतात किंवा लसीकरण झाल्यावर किती दिवसांनी त्या विकसित होतात, हे जाणून घेण्यासाठी तपासणी करण्याकडे कल आहे. मात्र, अँटिबॉडी म्हणजे संपूर्ण प्रतिकारशक्ती नव्हे, असे वैद्यकतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून कोणतेही नियम न पाळता बिनधास्त वावरणे चुकीचे आहे. डॉक्टरांकडून टेस्ट करून घेण्याचा सल्ला शक्यतो दिला जात नाही.

शरीरातील रक्ताचा नमुना घेऊन विशिष्ट मशिनच्या अथवा किटच्या साहायाने अँटिबॉडीचे प्रमाण मोजले जाते. या चाचण्यांचे परिणाम आपण 'संरक्षित आहोत' किंवा 'संरक्षित नाही' हे ठरवण्यासाठी पुरेशी माहिती देऊ शकत नाहीत. कोविडची लागण किंवा लसीकरणाला शरीराच्या प्रतिसादाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रतिपिंडे. अँटिबॉडी चाचण्यांमधून रोगप्रतिकारकशक्तीचा अचूक अंदाज बांधता येत नाही.

बरेचदा अँटिबॉडी उपस्थित नसल्या तरी टी-सेल अथवा मेमरी सेलच्या माध्यमातून शरीराला संरक्षण मिळत असते.

----------

अँटिबॉडी चाचणी गरजेची नसते. कारण, त्यातून केवळ रोगप्रतिकारशक्तीचा एक भाग मोजला जातो. बहुतांश प्रयोगशाळांमध्ये एकूण अँटिबॉडीची टेस्ट केली जाते. रोगप्रतिकारकशक्तीमध्ये न्यूट्रलायझिंग अँटिबॉडी जास्त महत्त्वाच्या असतात. एखाद्याच्या शरीरात अँटिबॉडीची पातळी कमी असली तरी पुरेशा टी पेशी असू शकतात. संक्रमणास लढण्यासाठी ते महत्त्वपूर्ण साधन आहे. म्हणून डॉक्टरांकडून तपासणीची सरसकट शिफारस केली जात नाही. एफडीएच्या म्हणण्यानुसार, लोकांनी लसीची परिणामकारकता शोधण्यासाठी अँटिबॉडी चाचण्यांवर अवलंबून राहू नये.

- डॉ. सुहृद सरदेसाई, जनरल फिजिशियन

-------

लागण होऊन गेल्यानंतर आणि लसीकरण झाल्यानंतर अँटिबॉडी टेस्टसाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्यांनी जास्त आहे. अबॅट मशिनच्या साहाय्याने तपासणी केली जाते. १.४ पेक्षा प्रमाण कमी असल्यास टेस्ट निगेटिव्ह आणि १.४ पेक्षा जास्त असल्यास पॉझिटिव्ह मानली जाते. सौम्य लागण होऊन गेली असेल तर प्रमाण ५-६ च्या दरम्यान असते. तीव्र लागण होऊन गेली असल्यास हे प्रमाण २०-४० इतकेही असू शकते. लागण होऊन गेल्यावर एक-दोन महिन्यात टेस्ट केल्यास अँटिबॉडीचे प्रमाण जास्त असते. तीन-चार महिन्यांनी टेस्ट केल्यास प्रमाण कमी होऊ शकते.

- डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट

------

अँटिबॉडी टेस्टसाठी फार मोठ्या प्रमाणात सध्या विचारणा होताना दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला परदेशात जाताना सध्या तरी लसीकरणाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. अँटिबॉडी प्रमाण मोजण्यासाठी रक्त तपासणी बंधनकारक नाही.

- डॉ. शार्दूल सहाणे, पॅथॉलॉजिस्ट

----

जिल्ह्यात झालेले लसीकरण

पहिला डोस - ५५,२२.०८३

दोन्ही डोस - १२,७६,१७९