शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गोनीदांच्या जन्मदिनी ‘दुर्गवारी दिना’ची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ ...

पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ जुलै रोजी झाला. या निमित्ताने ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ साजरा करण्याची घोषणा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली.

महासंघाने गोनीदांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी गोनीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आठ जुलै हा दिवस यापुढे ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ म्हणून महासंघ साजरा करणार असल्याची घोषणा केली. गोनीदांनी केलेले दुर्गसंस्कार, किल्ले पाहण्यासंदर्भात त्यांनी दिलेली दृष्टी याबद्दल अॅड. आनंद देशपांडे यांनी विचार मांडले.

गोपाळ नीळकंठ दांडेकर (अप्पा) म्हणजे महाराष्ट्राचे गोनीदा, मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. जातिवंत भटक्या वृत्तीचे. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर आणि त्यांची भटकी वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळे किल्ले पाहिले. गोनीदांनी आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केले असेल, तर ते किल्ल्यांवर. या किल्ल्यांच्या भटकंतीमधून त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी नितांतसुंदर पुस्तके लिहिली. हजारो वाचकांना या पुस्तकांमधून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली.

ऑनलाईन दुर्गवारी दिनानिमित्त अभिनेत्री आणि गोनीदांची नात मृणाल कुलकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. दुर्गभ्रमण अन किल्ल्यांविषयीच्या जागृतीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग व्हावा. पुढच्या पिढीकडे हा वारसा डिजिटल आणि दृकश्राव्य पद्धतीने पोहोचावा, असे त्यांनी सांगितले. गोनीदांची कन्या डॉ. वीणा देव यांनी सांगितले, “गोनीदा हे फक्त गडकोटांवर भटकंती करत नव्हते तर त्या गडकोटांवर राहणारे सारेच त्यांच्या घरचे झाले होते. एकटे आप्पा जरी किल्ल्यावर असले तरी किल्ला भरल्यासारखा वाटतो, ही भावना या ‘गडकरीं’ची असे आणि म्हणून हे गडकिल्ले मला माझ्या माहेरासारखेच आहेत.” नीलेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. हृषीकेश यादव यांनी आभार मानले. देशविदेशातून पाचशे लोकांनी या वेबिनारला उपस्थिती लावली.

चौकट

“केवळ पिकनिकसाठी म्हणून किल्ल्यांवर न जाता त्याचा इतिहास आणि भूगोल समजून घेऊन किल्ले पाहावेत. त्यामुळे आपल्या किल्ल्यांचे आणि पर्यायाने इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. किल्ले ही धारातीर्थे आहेत. ती फक्त पर्यटनस्थळ होऊ नयेत यासाठी गोनीदांचे साहित्य संस्कार महत्त्वाचे आहेत.”

-अॅड. आनंद देशपांडे