शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोनीदांच्या जन्मदिनी ‘दुर्गवारी दिना’ची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ ...

पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ जुलै रोजी झाला. या निमित्ताने ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ साजरा करण्याची घोषणा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली.

महासंघाने गोनीदांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी गोनीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आठ जुलै हा दिवस यापुढे ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ म्हणून महासंघ साजरा करणार असल्याची घोषणा केली. गोनीदांनी केलेले दुर्गसंस्कार, किल्ले पाहण्यासंदर्भात त्यांनी दिलेली दृष्टी याबद्दल अॅड. आनंद देशपांडे यांनी विचार मांडले.

गोपाळ नीळकंठ दांडेकर (अप्पा) म्हणजे महाराष्ट्राचे गोनीदा, मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. जातिवंत भटक्या वृत्तीचे. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर आणि त्यांची भटकी वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळे किल्ले पाहिले. गोनीदांनी आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केले असेल, तर ते किल्ल्यांवर. या किल्ल्यांच्या भटकंतीमधून त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी नितांतसुंदर पुस्तके लिहिली. हजारो वाचकांना या पुस्तकांमधून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली.

ऑनलाईन दुर्गवारी दिनानिमित्त अभिनेत्री आणि गोनीदांची नात मृणाल कुलकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. दुर्गभ्रमण अन किल्ल्यांविषयीच्या जागृतीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग व्हावा. पुढच्या पिढीकडे हा वारसा डिजिटल आणि दृकश्राव्य पद्धतीने पोहोचावा, असे त्यांनी सांगितले. गोनीदांची कन्या डॉ. वीणा देव यांनी सांगितले, “गोनीदा हे फक्त गडकोटांवर भटकंती करत नव्हते तर त्या गडकोटांवर राहणारे सारेच त्यांच्या घरचे झाले होते. एकटे आप्पा जरी किल्ल्यावर असले तरी किल्ला भरल्यासारखा वाटतो, ही भावना या ‘गडकरीं’ची असे आणि म्हणून हे गडकिल्ले मला माझ्या माहेरासारखेच आहेत.” नीलेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. हृषीकेश यादव यांनी आभार मानले. देशविदेशातून पाचशे लोकांनी या वेबिनारला उपस्थिती लावली.

चौकट

“केवळ पिकनिकसाठी म्हणून किल्ल्यांवर न जाता त्याचा इतिहास आणि भूगोल समजून घेऊन किल्ले पाहावेत. त्यामुळे आपल्या किल्ल्यांचे आणि पर्यायाने इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. किल्ले ही धारातीर्थे आहेत. ती फक्त पर्यटनस्थळ होऊ नयेत यासाठी गोनीदांचे साहित्य संस्कार महत्त्वाचे आहेत.”

-अॅड. आनंद देशपांडे