शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोनीदांच्या जन्मदिनी ‘दुर्गवारी दिना’ची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ ...

पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ जुलै रोजी झाला. या निमित्ताने ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ साजरा करण्याची घोषणा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली.

महासंघाने गोनीदांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी गोनीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आठ जुलै हा दिवस यापुढे ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ म्हणून महासंघ साजरा करणार असल्याची घोषणा केली. गोनीदांनी केलेले दुर्गसंस्कार, किल्ले पाहण्यासंदर्भात त्यांनी दिलेली दृष्टी याबद्दल अॅड. आनंद देशपांडे यांनी विचार मांडले.

गोपाळ नीळकंठ दांडेकर (अप्पा) म्हणजे महाराष्ट्राचे गोनीदा, मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. जातिवंत भटक्या वृत्तीचे. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर आणि त्यांची भटकी वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळे किल्ले पाहिले. गोनीदांनी आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केले असेल, तर ते किल्ल्यांवर. या किल्ल्यांच्या भटकंतीमधून त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी नितांतसुंदर पुस्तके लिहिली. हजारो वाचकांना या पुस्तकांमधून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली.

ऑनलाईन दुर्गवारी दिनानिमित्त अभिनेत्री आणि गोनीदांची नात मृणाल कुलकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. दुर्गभ्रमण अन किल्ल्यांविषयीच्या जागृतीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग व्हावा. पुढच्या पिढीकडे हा वारसा डिजिटल आणि दृकश्राव्य पद्धतीने पोहोचावा, असे त्यांनी सांगितले. गोनीदांची कन्या डॉ. वीणा देव यांनी सांगितले, “गोनीदा हे फक्त गडकोटांवर भटकंती करत नव्हते तर त्या गडकोटांवर राहणारे सारेच त्यांच्या घरचे झाले होते. एकटे आप्पा जरी किल्ल्यावर असले तरी किल्ला भरल्यासारखा वाटतो, ही भावना या ‘गडकरीं’ची असे आणि म्हणून हे गडकिल्ले मला माझ्या माहेरासारखेच आहेत.” नीलेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. हृषीकेश यादव यांनी आभार मानले. देशविदेशातून पाचशे लोकांनी या वेबिनारला उपस्थिती लावली.

चौकट

“केवळ पिकनिकसाठी म्हणून किल्ल्यांवर न जाता त्याचा इतिहास आणि भूगोल समजून घेऊन किल्ले पाहावेत. त्यामुळे आपल्या किल्ल्यांचे आणि पर्यायाने इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. किल्ले ही धारातीर्थे आहेत. ती फक्त पर्यटनस्थळ होऊ नयेत यासाठी गोनीदांचे साहित्य संस्कार महत्त्वाचे आहेत.”

-अॅड. आनंद देशपांडे