शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

ऐन दिवाळीत दुष्काळाने हिरावला त्यांचा भाकरीचा चंद्र

By admin | Updated: November 10, 2015 01:54 IST

सलगच्या दुष्काळाने गावे तर मोडून पडली आहेतच, पण ज्ञानाच्या दिव्याने अंधारलेल्या परिस्थितीवर प्रकाश शोधणाऱ्या विद्यार्थ्यांवरही संकट कोसळले आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेसलगच्या दुष्काळाने गावे तर मोडून पडली आहेतच, पण ज्ञानाच्या दिव्याने अंधारलेल्या परिस्थितीवर प्रकाश शोधणाऱ्या विद्यार्थ्यांवरही संकट कोसळले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना दररोज पोटभर जेवण करणेही शक्य होईनासे झाले आहे. एक वेळचेच जेवण तेदेखील मैत्रिणींसोबत डबा शेअर करून घेणेच त्यांना परवडत आहे. लातूर, नगर, सोलापूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील या विद्यार्थिनी आहेत. सगळ्या जणी पोस्ट ग्रॅज्युएशन करीत असून, त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. आत्तापर्यंत आई-वडील पोटाला चिमटा काढून कसेबसे पैसे पाठवीत होते. पण, दुष्काळाने त्यांनाच मोडून टाकल्याने घर चालविण्याची पंचायत. त्यामुळे मुलीला उचलून पैसे देणेच शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचे हाल सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काकणेवाडीची संगीता वाळुंज एमएससी स्टॅटिस्टिक्स करत आहे. मागील वर्षी ८९ टक्के गुण मिळविले; मात्र खुल्या प्रवर्गात असल्याने शिष्यवृत्ती नाही. त्यामुळे घरून येणाऱ्या पैशावरच शिक्षण घ्यावे लागत आहे. संगीता म्हणाली, ‘‘गावाकडे सलग तीन वर्षांचा दुष्काळ आहे. वडिलांची पोटापुरती शेती... पण त्यातही काही उगवले नाही. त्यांनाच घर चालवायची भ्रांत, तर मी पैसे कसे मागायचे. त्यामुळे मी एक वेळच जेवण करते. भूक लागली तर मैत्रिणीच्या डब्यात शेअर करतेय.’’ श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमालाची वैशाली मुल्ला रसायनशास्त्रात एमएससी करतेय. गेल्या वर्षी ८१ टक्के गुण मिळाले. तिलाही दुष्काळामुळे गेल्या काही दिवसांपासून पैसे येणेच बंद झाले. होस्टेलची फी भरायलाही पैसे नाहीत... एक वेळ जेवण करून दिवस काढायचे. संगीता आणि वैशालीसारखीच अनेकींची स्थिती आहे. पुण्यात रहाणे, जेवण व किरकोळ खर्चच ३ ते ४ हजाराच्या घरात जातो. त्यात परीक्षा फी, प्रोजेक्ट, नोट्स, पुस्तके याचा खर्च वेगळा येतो. तो टाळता येत नाही. त्यामुळे एक वेळ जेवण करूनच पैसे वाचवावे लागतात.