शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संतप्त नीरादेवघर धरणग्रस्तांनी पाणी रोखले

By admin | Updated: November 23, 2015 00:54 IST

नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले

भोर : नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले पाणी व सुरू असलेले उजव्या कालव्याचे काम नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन शेतकरी संघटनेने बंद केले. आक्रमक झालेल्या धरणग्रस्तांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे. सकाळी आठ वाजता पाटबंधारे विभागाकडून नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते. ते पाणी नीरा नदीने आपटी गावापर्यंत आल्यावर धरणग्रस्तांच्या लक्षात आल्यावर संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे, चिमण शिरवले, हनुमंत कंक, लक्ष्मण धामुणसे, किसन दिघे, नथू दिघे यांनी धरणातून सोडलेले पाणी बंद केले. आमच्या मागण्यांची पूर्तता करा, मगच पाणी खाली सोडा, अशी मागणी त्यांनी केली.२६ आॅक्टोबरला विविध मागण्यांसाठी नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने धरणावर काम बंद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पाटबंधारे विभागाकडून मागण्यांसंदर्भात ५ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी व संबंंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे लेखी कार्यकारी अभियंता पवार यांनी दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ती बैठक झालीच नाही. ती पुढे ढकलून १९ नाव्हेंबर तारीख देण्यात आली. तीही बैठक झाली नाही. वीस वर्षांपासून नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.