शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

आंदोलनातील जागेच्या बदलावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंदोलनाच्या जागेत बदल करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावरून राजकीय पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आंदोलनाच्या जागेत बदल करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावरून राजकीय पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आम आदमी पार्टीने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपला रोष व्यक्त केला.

वाहतूककोंडीचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी जागा बदल केला आहे. आंदोलनाला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील एका गल्लीत जागा दिली आहे. ती गैरसोयीची असल्याचे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आंदोलन करण्याची वेळ येते हे प्रशासनkचे अपयश असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर होणारी उपोषणे, निषेध व निदर्शनावर बंदी घालणारा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

गरीब जनतेला आवाज उठवायचा तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. तो आवाजच दाबण्याचा हा प्रयत्न आहे. कचेरीच्या मागे जाऊन आंदोलन करायला ते चोर आहेत का? हा आदेश मागे घेतला जावा यासाठी आता तिथेच आंदोलन करायला हवे, असे सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार म्हणाले. मनसेचे शहरप्रमुख वसंत मोरे म्हणाले, “जनतेच्या आंदोलनाची इतकी भीती वाटत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी बदली करून घ्यावी किंवा एखाद्या आयटी कंपनीत सीईओ म्हणून जावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आदेशाला विरोध आहे.”

शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी नागरिकांचा रोष सरकारपर्यंत पोहचवणे हे सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे काम असल्याचे म्हटले. पेट्रोल, डिझेल दरवाढ, पीपीएफवरचा व्याजदर कमी करणे या केंद्र सरकारच्या निर्णयावर आंदोलन करायचे नाही का? जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. लोकशाहीत आंदोलन, मोर्चे यांना विशेष महत्त्व आहे. तेच मोडून काढण्याचा हा प्रकार आहे. आंदोलनाची पूर्वीची जागा कायम ठेवावी, असे ते म्हणाले.