शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

सर्वच दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आज (सोमवारी) महापालिकेने पुणे शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आज (सोमवारी) महापालिकेने पुणे शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत़ यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह (अत्यावश्यक सेवा) इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे़ मात्र शनिवारी, रविवारी केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता आहे़ ही सवलत दहा दिवसांसाठीच दिली असून, त्यानंतर कोरोनाची स्थिती पाहून पुढील निर्णय होणार आहे.

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे, पुणे शहरासाठी लॉकडाऊन शिथिल करतानाची नवीन नियमावली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज जाहीर केली़ यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या दिवशी सुरू राहतील़ तर ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक सेवा व वस्तू तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांचीही घरपोच सेवा सुरू करण्यास परवागनी देण्यात आली आहे़

या नव्या निर्णयामुळे शहरात किराणा, भाजीपाला, मेडिकल, दूधविक्री आदी अत्यावश्यक सेवांसह, कपडे, स्टेशनरी, संगणक विक्री, सोने-चांदी आदी इतर सर्व व्यवसायांना आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास मार्यादित कालावधीकरिता मान्यता मिळाली आहे़ यामध्ये मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे़ मात्र रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी सेवा देऊ शकणार आहेत़ तर कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्याच्याशी निगडित देखभाल व दुरुस्त सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे़

महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोनाविषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त) २५ टक्के अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़

---------------------

दुपारी ३ नंतर पूर्णत: संचारबंदी

महापालिकेने लॉकडाऊन शिथिल करताना सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकानांना परवागनी दिली आहे़ मात्र, दुकाने बंद झाल्यावर एक तासाच्या कालावधीनंतर म्हणजे दुपारी ३ नंतर नागरिकांना वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही़ दुपारी तीननंतर अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध (संचारबंदी) करण्यात आला आहे़

शहरासाठी जाहीर करण्यात आलेले हे आदेश १ जूनपासून पुढील १० दिवस लागू राहणार आहेत़ त्यानंतर कोरोना पॉझिटिव्हिटीबाबतचा आढावा घेऊन, त्याअनुषंगाने पुढील आदेश काढण्यात येणार असल्याचेही आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे़

-----------------------------

मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, आठवडी बाजार बंद राहणार

शहरात गर्दी होणारी ठिकाणे म्हणजेच, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, आठवडी बाजार सुरू करण्यास अद्याप महापालिकेने परवानगी दिलेली नाही़ तसेच लग्न समारंभ, सभा-समारंभ आदी कार्यक्रमांवरील निर्बंध अद्यापही कायम आहेत़ यात कोणतीही सुट देण्यात आलेली नाही़

---------------