शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पक्ष स्वबळावर

By admin | Updated: February 4, 2017 03:57 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेससह सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज भरण्यास बुधवारपासून (दि. १) सुरुवात झाली आहे. गुरुवारपर्यंत कोणत्याही पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. बंडखोरी होण्याची शक्यता पाहता सर्वच पक्ष ‘पहिले आप, पहिले आप’ करत यादी जाहीर करत नव्हते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनीही १ फेब्रुवारीला यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनीही यादी जाहीर केली नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींना आलेल्या इच्छुकांची संख्या बघता आधीच यादी जाहीर केली तर बंडखोरी होण्याची मोठी शक्यता आहे, त्यामुळे त्यांनीही ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवले असून, ६ फेब्रुवारीपर्यंत यादी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.शुक़्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र पत्रकार परिषद घेत आपली जिल्हा परिषद गटासाठीची १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या यादीत वेल्हे तालुक्यातील कुरण खुर्द विंझर या सर्वसाधारण गटातून काँग्रेसच्या विद्यमान सदस्या वसुधा नलावडे यांचे पती अमोल नलावडे यांना तर भोर तालुक्यातील कारी उत्रौली या सर्वसाधारण गटातून विद्यमान सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आनंद आंबवले यांना उमेदवारी मिळाली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. तसेच पुरंदरचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरूंगे यांना बेलसर-माळशिरस या नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तिसरी आघाडीही अधांतरीराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती काबीज करण्यासाठी भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले. परंतु, शिवसेना-भाजपाची युती संपुष्टात आली. त्यानंतर रासप, स्वाभिमानी शेतकरी हे एकत्रीत येऊन तिसरी आघाडी करून राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढण्याची रणनीती आखत होते. मात्र अद्याप याबाबत एकमत झाल्याचे दिसत नाही.दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष यांची युती झाल्याचे समजते. रासपला कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, शुक्रवारीही याबाबत बैठक घेण्यात आली.