शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

सर्व पक्ष स्वबळावर

By admin | Updated: February 4, 2017 03:57 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेससह सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज भरण्यास बुधवारपासून (दि. १) सुरुवात झाली आहे. गुरुवारपर्यंत कोणत्याही पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. बंडखोरी होण्याची शक्यता पाहता सर्वच पक्ष ‘पहिले आप, पहिले आप’ करत यादी जाहीर करत नव्हते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनीही १ फेब्रुवारीला यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनीही यादी जाहीर केली नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींना आलेल्या इच्छुकांची संख्या बघता आधीच यादी जाहीर केली तर बंडखोरी होण्याची मोठी शक्यता आहे, त्यामुळे त्यांनीही ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवले असून, ६ फेब्रुवारीपर्यंत यादी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.शुक़्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र पत्रकार परिषद घेत आपली जिल्हा परिषद गटासाठीची १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या यादीत वेल्हे तालुक्यातील कुरण खुर्द विंझर या सर्वसाधारण गटातून काँग्रेसच्या विद्यमान सदस्या वसुधा नलावडे यांचे पती अमोल नलावडे यांना तर भोर तालुक्यातील कारी उत्रौली या सर्वसाधारण गटातून विद्यमान सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आनंद आंबवले यांना उमेदवारी मिळाली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. तसेच पुरंदरचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरूंगे यांना बेलसर-माळशिरस या नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तिसरी आघाडीही अधांतरीराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती काबीज करण्यासाठी भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले. परंतु, शिवसेना-भाजपाची युती संपुष्टात आली. त्यानंतर रासप, स्वाभिमानी शेतकरी हे एकत्रीत येऊन तिसरी आघाडी करून राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढण्याची रणनीती आखत होते. मात्र अद्याप याबाबत एकमत झाल्याचे दिसत नाही.दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष यांची युती झाल्याचे समजते. रासपला कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, शुक्रवारीही याबाबत बैठक घेण्यात आली.