शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अलंकापुरी सज्ज!

By admin | Updated: June 16, 2017 04:46 IST

संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि. १७) पार पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि. १७) पार पडणार आहे. संपूर्ण अलंकापुरीवर सीसीटीव्हीचा वॉच असेल. वारी काळात संपूर्ण शहरात २४ तास एकूण चार विभागांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा तैनात करण्यात आल्याने भाविकांना हा सोहळा सुरक्षितपणे अनुभवता येणार आहे. दरम्यान, विविध जिल्ह्यांतून मागविण्यात आलेला फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलंकापुरीत भाविक-भक्त दाखल होऊ लागले आहेत. येत्या दोन दिवसांत लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत हजेरी लावेल. त्यामुळे हा सोहळा संपेपर्यंत संपूर्ण शहरात गर्दी असते. अशा वेळी भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने विविध व्यापक उपाययोजनांची तरतूद केली आहे. सोहळा संपेपर्यंत २४ तास पहारा दिला जाणार आहे.शहरातील प्रमुख असलेल्या चाकण चौक, वडगाव चौक, हजेरी मारुती, मरकळ चौक, पोलीस ठाणे परिसर, भराव रस्ता, नगर परिषद परिसर, बसथांबा परिसर तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासन व पालिकेकडून ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात आला आहे. देवस्थानाचेही फिरते सीसीटीव्ही कॅमेरे शहरावर नजर ठेवणार आहेत. सीसीटीव्हीचे पोलीस ठाण्यातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इंद्रायणी तीरावर कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाच्या फिरत्या गाड्या लूटमार करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवून संशयास्पद प्रकार आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत. पोलिसांचा फौजफाटा तैनात अलंकापुरीत १ पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ५८ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ६०५ पोलीस हवालदार, ६०० होमगार्ड, १०० एसआरपीचे जवान, १ बीडीडीएसचे पथक, २ बॉम्ब स्कॉड पथके तैनात करण्यात आली आहेत. महिलांची छेडछाड होऊ नये, यासाठी अर्चना दयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच, सोहळा कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशात पोलीस वॉच ठेवून आहेत.जड वाहनांना प्रवेश बंद चाकण-शिक्रापूर महामार्गाकडून होणारी वाहतूक शेलगाव फाट्यापासून कोयाळीमार्गे मरकळला वळविण्यात येणार आहे. तसेच, पुणे-नगर महामार्गाकडून आळंदीकडे येणारी वाहतूक मरकळमार्गे चाकण-शिक्रापूर हायवेकडे वळविली जाणार आहे. पुणे-नाशिक महामार्ग आळंदी फाट्यावरून जड वाहनांना शहराकडे प्रवेश नाही. वडगाव रस्त्यावरील विश्रांतवडाच्या पुढे पासधारक वाहने वगळता चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. विश्रांतवड, चऱ्होली फाट्यावर वाहनांच्या पार्किंगची सोय केली आहे.