शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आळंदीचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 23, 2014 05:03 IST

४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे.

कडूस : ४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे. तसेच कडूस प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. मंगळवारी ( २० मे ) ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. या निर्णयाने खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी या दोन महत्त्वाच्या मोठ्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मंगळवारी मुंबई येथे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, राज्यमंत्री रणजित देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्या सोबत खेड तालुक्यातील राजगुरुनगर, आळंदी योजनांविषयी चर्चा झाली. शासनाने यापूर्वी आळंदीसाठी ३५ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली आहे. सदर योजना रेंगाळल्यामुळे या योजनेचा खर्च वाढला. योजना मार्गी लागण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक मंत्रिमंडळाकडून मंजूर होणे आवश्यक होते. काल झालेल्या संबंधित मंत्र्यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा निघाला. आळंदी नगरपालिकेसाठी ४७ कोटींची सुधारित अंदाजपत्रकीय रक्कम या वेळी मंजूर करून घेतली. यामुळे आळंदीची पाणी योजना मार्गी लागणार आहे. राजगुरुनगरसह पाच गावे आणि परिसराला उपयोगी असणार्‍या आणि बंद अवस्थेत असणार्‍या कडूस प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठीही ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून योजना कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने पाइप बदलणे हे मुख्य काम करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सदर योजना चालू राहावी आणि गावांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी या योजनेच्या वीजबिलाची जबाबदारी ही जिल्हा परिषदेने घेतली आहे. कडूस प्रादेशिक योजना कार्यान्वित झाल्यास राजगुरुनगर चांडोली, शिरोली, राक्षेवाडी या गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, ही योजना राजगुरुनगरकडे हस्तांतरित करावी, अशी राजगुरुनगरची मागणी होती. त्याचप्रमाणे सदर योजनेचे २ कोटी रुपये थकीत वीजबिल शासनाने आश्वासन दिल्यानुसार भरावे, अशीही मागणी होती. राजगुरुनगर ग्रामस्थांचे यासाठी उपोषणही झाले होते. कडूस प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (वार्ताहर)