शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 23, 2014 05:03 IST

४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे.

कडूस : ४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे. तसेच कडूस प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. मंगळवारी ( २० मे ) ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. या निर्णयाने खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी या दोन महत्त्वाच्या मोठ्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मंगळवारी मुंबई येथे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, राज्यमंत्री रणजित देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्या सोबत खेड तालुक्यातील राजगुरुनगर, आळंदी योजनांविषयी चर्चा झाली. शासनाने यापूर्वी आळंदीसाठी ३५ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली आहे. सदर योजना रेंगाळल्यामुळे या योजनेचा खर्च वाढला. योजना मार्गी लागण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक मंत्रिमंडळाकडून मंजूर होणे आवश्यक होते. काल झालेल्या संबंधित मंत्र्यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा निघाला. आळंदी नगरपालिकेसाठी ४७ कोटींची सुधारित अंदाजपत्रकीय रक्कम या वेळी मंजूर करून घेतली. यामुळे आळंदीची पाणी योजना मार्गी लागणार आहे. राजगुरुनगरसह पाच गावे आणि परिसराला उपयोगी असणार्‍या आणि बंद अवस्थेत असणार्‍या कडूस प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठीही ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून योजना कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने पाइप बदलणे हे मुख्य काम करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सदर योजना चालू राहावी आणि गावांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी या योजनेच्या वीजबिलाची जबाबदारी ही जिल्हा परिषदेने घेतली आहे. कडूस प्रादेशिक योजना कार्यान्वित झाल्यास राजगुरुनगर चांडोली, शिरोली, राक्षेवाडी या गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, ही योजना राजगुरुनगरकडे हस्तांतरित करावी, अशी राजगुरुनगरची मागणी होती. त्याचप्रमाणे सदर योजनेचे २ कोटी रुपये थकीत वीजबिल शासनाने आश्वासन दिल्यानुसार भरावे, अशीही मागणी होती. राजगुरुनगर ग्रामस्थांचे यासाठी उपोषणही झाले होते. कडूस प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (वार्ताहर)