शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘२०१६’ला फडणवीसांनी केले त्याचेच उट्टे काढले अजितदादांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तेवीस गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य शासनाच्या ‘पीएमआरडीए’लाच ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याबाबत अधिसूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तेवीस गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य शासनाच्या ‘पीएमआरडीए’लाच ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याबाबत अधिसूचना काढूनही या गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा प्रयत्न राज्य शासन दरबारी यशस्वी ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

महापालिकेत सन २०१६ साली विकास आराखड्याबाबत सर्वसाधारण सभा सुरू असतानाच तत्कालीन राज्य सरकारने विकास आराखड्याचे सर्व अधिकार स्वत:कडे घेत असल्याची अधिसूचना काढली. त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विकास आराखड्याबाबतची सभा तहकूब करून, विकास आराखड्याचे सर्व दप्तर शासनाला द्यावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली.

महापालिकेच्या खास सभेच्या आदल्या दिवशीच राज्य सरकारने पीएमआरडीएला ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना काढली तरीही सत्ताधाऱ्यांनी खास सभा घेत प्रस्ताव मान्य करुन घेतला. हा प्रस्ताव आता महापालिका आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी गेला आहे. त्या ठिकाणीच तो निरस्त होण्याची शक्यता आहे. त्यांनी तो राज्य सरकारकडे पाठवला तरी तेथे त्याची किंमत शून्य होणार आहे. कारण त्याआधीच शासनाने निर्णय घेतला. परिणामी नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावातील ‘गटर, वॉटर, मिटर’, स्वच्छतेची कामेच प्रामुख्याने महापालिकेला करावी लागणार आहेत.

चौकट

प्रशासनाची सावध भूमिका

आजच्या खास सर्वसाधारण सभेत प्रशासनाने खूप सावध भूमिका घेत सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार सभा चालू दिली. पण अखेरीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या ठराव मान्यतेविषयी भाष्य न करता सभेला उत्तर देताना सांगितले की तेवीस गावे २३ डिसेंबर, २०२० ला अधिसूचना निघून, ३० जूनला प्रत्यक्षात समाविष्ट झाली. “आम्ही ही गावे महापालिकेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी शासनाने पीएमआरडीएला विशेष प्राधिकरण नियुक्त केले आहे. त्यानुसार २३ गावे आपल्याकडे पीएमआरडीए म्हणून नियोजित झाली,” असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मान्य केलेल्या ठरावावर भाष्य करणे त्यांनी टाळले.