शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘२०१६’ला फडणवीसांनी केले त्याचेच उट्टे काढले अजितदादांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तेवीस गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य शासनाच्या ‘पीएमआरडीए’लाच ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याबाबत अधिसूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तेवीस गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य शासनाच्या ‘पीएमआरडीए’लाच ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याबाबत अधिसूचना काढूनही या गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा प्रयत्न राज्य शासन दरबारी यशस्वी ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

महापालिकेत सन २०१६ साली विकास आराखड्याबाबत सर्वसाधारण सभा सुरू असतानाच तत्कालीन राज्य सरकारने विकास आराखड्याचे सर्व अधिकार स्वत:कडे घेत असल्याची अधिसूचना काढली. त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विकास आराखड्याबाबतची सभा तहकूब करून, विकास आराखड्याचे सर्व दप्तर शासनाला द्यावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली.

महापालिकेच्या खास सभेच्या आदल्या दिवशीच राज्य सरकारने पीएमआरडीएला ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना काढली तरीही सत्ताधाऱ्यांनी खास सभा घेत प्रस्ताव मान्य करुन घेतला. हा प्रस्ताव आता महापालिका आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी गेला आहे. त्या ठिकाणीच तो निरस्त होण्याची शक्यता आहे. त्यांनी तो राज्य सरकारकडे पाठवला तरी तेथे त्याची किंमत शून्य होणार आहे. कारण त्याआधीच शासनाने निर्णय घेतला. परिणामी नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावातील ‘गटर, वॉटर, मिटर’, स्वच्छतेची कामेच प्रामुख्याने महापालिकेला करावी लागणार आहेत.

चौकट

प्रशासनाची सावध भूमिका

आजच्या खास सर्वसाधारण सभेत प्रशासनाने खूप सावध भूमिका घेत सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार सभा चालू दिली. पण अखेरीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या ठराव मान्यतेविषयी भाष्य न करता सभेला उत्तर देताना सांगितले की तेवीस गावे २३ डिसेंबर, २०२० ला अधिसूचना निघून, ३० जूनला प्रत्यक्षात समाविष्ट झाली. “आम्ही ही गावे महापालिकेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी शासनाने पीएमआरडीएला विशेष प्राधिकरण नियुक्त केले आहे. त्यानुसार २३ गावे आपल्याकडे पीएमआरडीए म्हणून नियोजित झाली,” असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मान्य केलेल्या ठरावावर भाष्य करणे त्यांनी टाळले.