शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नववी, अकरावीसाठी हवा फाउंडेशन कोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील वर्गात प्रवेश देणे आणि अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे या स्वतंत्र बाबी आहेत. विद्यार्थ्याच्या काही मूलभूत संकल्पना त्या-त्या वर्गात स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद आहेत. परंतु, नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. तर अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू झाली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारसा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख व डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.

--

राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थितीत घेलेला निर्णय योग्य आहे. नववीत दहावीचा तर अकरावीत बारावीचा पाया भक्कम होता. त्यामुळे दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या विज्ञान, गणित आदी विषयातील संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने विविध संस्थांच्या सहकार्याने फाउंडेशन कोर्स तयार करावा. तसेच डिजिटल माध्यमातून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणार नाही.

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

---

आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट न‌ होणे हे विद्यार्थी हिताचे नाही. व्याकरणासह विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, भूगोल आदी विषयांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. त्यामुळे विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ