शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नववी, अकरावीसाठी हवा फाउंडेशन कोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील वर्गात प्रवेश देणे आणि अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे या स्वतंत्र बाबी आहेत. विद्यार्थ्याच्या काही मूलभूत संकल्पना त्या-त्या वर्गात स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद आहेत. परंतु, नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. तर अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू झाली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारसा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख व डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.

--

राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थितीत घेलेला निर्णय योग्य आहे. नववीत दहावीचा तर अकरावीत बारावीचा पाया भक्कम होता. त्यामुळे दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या विज्ञान, गणित आदी विषयातील संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने विविध संस्थांच्या सहकार्याने फाउंडेशन कोर्स तयार करावा. तसेच डिजिटल माध्यमातून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणार नाही.

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

---

आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट न‌ होणे हे विद्यार्थी हिताचे नाही. व्याकरणासह विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, भूगोल आदी विषयांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. त्यामुळे विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ