शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या यशस्वितेसाठी राज्यात कृषी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरिपाचा हंगाम भरघोस उत्पादनाचा व्हावा यासाठी कृषी विभागाच्यावतीने राज्यात ‘कृषी संजीवनी’ अभियान होणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खरिपाचा हंगाम भरघोस उत्पादनाचा व्हावा यासाठी कृषी विभागाच्यावतीने राज्यात ‘कृषी संजीवनी’ अभियान होणार आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी माहिती दिली. २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक तंत्राची, तसेच उत्पादन वाढ कशी करायची याचे मार्गदर्शन करणार आहेत.

संपूर्ण राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतजमिनीच्या पेरणीपूर्व मशागतीपासून बीजप्रक्रिया व खतमात्रा कोणती? किती? कशी द्यायची?, याबाबतच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना यात सहभाग बंधनकारक आहे. कोणत्या दिवशी कोणता विषय निवडायचा याची रचनाही निश्चित करण्यात आली आहे. या सर्वांनी त्यांचा या आठ दिवसांतील कामाचा रोजचा अहवाल आपापल्या वरिष्ठांना सादर करायचा आहे.

पाटील म्हणाले की, यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीची माहिती मिळेल. वेगळे प्रयोग करणाऱ्या, भरघोस उत्पादनासाठी पारितोषिक प्राप्त शेतकरी, तंत्रज्ञ यांना यात सामावून घेण्यात आले आहे. एखाद्या साध्या बदलानेही उत्पादनात वाढ होऊ शकते, अशा सिद्ध झालेल्या प्रयोगांच्या शेतकऱ्यांनाही यामध्ये अन्य शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी बरोबर घेण्यात येणार आहे.