शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

खरिपाच्या यशस्वितेसाठी राज्यात कृषी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरिपाचा हंगाम भरघोस उत्पादनाचा व्हावा यासाठी कृषी विभागाच्यावतीने राज्यात ‘कृषी संजीवनी’ अभियान होणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खरिपाचा हंगाम भरघोस उत्पादनाचा व्हावा यासाठी कृषी विभागाच्यावतीने राज्यात ‘कृषी संजीवनी’ अभियान होणार आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी माहिती दिली. २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक तंत्राची, तसेच उत्पादन वाढ कशी करायची याचे मार्गदर्शन करणार आहेत.

संपूर्ण राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतजमिनीच्या पेरणीपूर्व मशागतीपासून बीजप्रक्रिया व खतमात्रा कोणती? किती? कशी द्यायची?, याबाबतच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना यात सहभाग बंधनकारक आहे. कोणत्या दिवशी कोणता विषय निवडायचा याची रचनाही निश्चित करण्यात आली आहे. या सर्वांनी त्यांचा या आठ दिवसांतील कामाचा रोजचा अहवाल आपापल्या वरिष्ठांना सादर करायचा आहे.

पाटील म्हणाले की, यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीची माहिती मिळेल. वेगळे प्रयोग करणाऱ्या, भरघोस उत्पादनासाठी पारितोषिक प्राप्त शेतकरी, तंत्रज्ञ यांना यात सामावून घेण्यात आले आहे. एखाद्या साध्या बदलानेही उत्पादनात वाढ होऊ शकते, अशा सिद्ध झालेल्या प्रयोगांच्या शेतकऱ्यांनाही यामध्ये अन्य शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी बरोबर घेण्यात येणार आहे.