शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: January 16, 2015 03:06 IST

जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत

राहू : जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत काहीही कार्यवाही होत नाही. तसेच या जमिनीचे वाटप गुंंजवणी धरग्रस्तांसाठी होत असल्याने राहू बेट परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. येथे ताबा घेण्यासाठी धरणग्रस्त आल्यास त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा त्यांनी दिला आहे.राहूबेट (दौंड) परिसरातील ९ गावांतील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावर ‘भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव क्षेत्र’ असा, तर काही ठिकाणी सात-बाऱ्याच्या मालकी हक्कात जिल्हाधिकारी नाव लागले आहे. या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात, यासाठी दौंड तालुका भामा-आसखेड संपादित क्षेत्र शेतकरी कृती समिती व शिरूर, हवेली शेतकरी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी आंदोलने , बैठका झाल्या. शासनाने भामा-आसखेड धरणाचे पाणी दौंड, शिरूर, हवेली या तालुक्यांतील शेतकऱ्यांना जाणार नसेल व या भागात कालवा होत नसेल, तर या शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे व त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असा निर्णय घेऊन त्या जमिनी मूळ मालकांना देण्याबाबत अध्यादेश (आरपीए-३४१२/प्र.क्र.१0१/र-४ महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई-३२, दि. १/९/२0१४ ) काढला. परंतु, याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. या अध्यादेशाची अंमलबजावणी कधी होणार, याच्या प्रतीक्षेत बाधित शेतकरी आहेत. या सर्व प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्या होत्या. नवीन सरकार सत्तेत येऊन तीन महिने पूर्ण झाले; परंतु त्याबाबत ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. त्यानंतर हिवाळी अधिवेशनही पार पडले. काहीही निर्णय घेतला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते आता आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.आमचे क्षेत्र लाभक्षेत्रात येत नाही. तसेच येथे कालवाही केला नाही. त्यामुळे आमच्या जमीनीवर धरणग्रस्तांसाठी राखीव असा शेरा टाकण्याचा अधिकार शासनास नाही. त्यात आरक्षीत जमीनीचे वाटप धरणग्रस्तांसाठी सुरू महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत. हे चुकीचे आहे. हे वाटप झाले असले तरी जे लोक ताब्यासाठी येतील त्या ठिकाणी रक्तपात झाला तरी आंम्ही मागे हटणार नाही असा इशारा पिलाण वाडी येथील शेतकरी महेंद्र झुरूंगे यांनी दिला आहे. (वार्ताहर)