शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: January 16, 2015 03:06 IST

जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत

राहू : जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत काहीही कार्यवाही होत नाही. तसेच या जमिनीचे वाटप गुंंजवणी धरग्रस्तांसाठी होत असल्याने राहू बेट परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. येथे ताबा घेण्यासाठी धरणग्रस्त आल्यास त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा त्यांनी दिला आहे.राहूबेट (दौंड) परिसरातील ९ गावांतील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावर ‘भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव क्षेत्र’ असा, तर काही ठिकाणी सात-बाऱ्याच्या मालकी हक्कात जिल्हाधिकारी नाव लागले आहे. या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात, यासाठी दौंड तालुका भामा-आसखेड संपादित क्षेत्र शेतकरी कृती समिती व शिरूर, हवेली शेतकरी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी आंदोलने , बैठका झाल्या. शासनाने भामा-आसखेड धरणाचे पाणी दौंड, शिरूर, हवेली या तालुक्यांतील शेतकऱ्यांना जाणार नसेल व या भागात कालवा होत नसेल, तर या शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे व त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असा निर्णय घेऊन त्या जमिनी मूळ मालकांना देण्याबाबत अध्यादेश (आरपीए-३४१२/प्र.क्र.१0१/र-४ महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई-३२, दि. १/९/२0१४ ) काढला. परंतु, याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. या अध्यादेशाची अंमलबजावणी कधी होणार, याच्या प्रतीक्षेत बाधित शेतकरी आहेत. या सर्व प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्या होत्या. नवीन सरकार सत्तेत येऊन तीन महिने पूर्ण झाले; परंतु त्याबाबत ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. त्यानंतर हिवाळी अधिवेशनही पार पडले. काहीही निर्णय घेतला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते आता आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.आमचे क्षेत्र लाभक्षेत्रात येत नाही. तसेच येथे कालवाही केला नाही. त्यामुळे आमच्या जमीनीवर धरणग्रस्तांसाठी राखीव असा शेरा टाकण्याचा अधिकार शासनास नाही. त्यात आरक्षीत जमीनीचे वाटप धरणग्रस्तांसाठी सुरू महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत. हे चुकीचे आहे. हे वाटप झाले असले तरी जे लोक ताब्यासाठी येतील त्या ठिकाणी रक्तपात झाला तरी आंम्ही मागे हटणार नाही असा इशारा पिलाण वाडी येथील शेतकरी महेंद्र झुरूंगे यांनी दिला आहे. (वार्ताहर)