शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

खरिपानंतर आता रब्बी हंगामाचीही चिंता

By admin | Updated: September 27, 2015 01:26 IST

खरिपाच्या हंगामातील उत्पन्नात तीस ते पन्नास टक्के घट येण्याची भीती असताना रब्बीचा पाऊसही पुणे जिल्ह्यात सलग नाही.

पुणे : खरिपाच्या हंगामातील उत्पन्नात तीस ते पन्नास टक्के घट येण्याची भीती असताना रब्बीचा पाऊसही पुणे जिल्ह्यात सलग नाही. त्यामुळे शेतकरी पेरण्यांबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे रब्बीचा हंगाम तरी समाधानकारक असेल किंवा कसे याबाबतच्या चिंतेने बळीराजाला घेरले आहे. हंगाम सरत आला तरीही जोरदार पावसाची शेतकऱ्यांची आशा अजूनही संपलेली नाही. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात खरिपात झालेली बाजरी आणि मुगाची शंभर टक्के पेरणी वाया गेली आहे. भात, भुईमूग, बाजरी, मूग, ज्वारी या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पन्नात निम्म्याहून अधिक घट येण्याची भीती आहे. ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा आहेत, अशाही ठिकाणी तीस टक्के घट येऊ शकेल, असे जाणकारांचे मत आहे.मौसमी पाऊस जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांत समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. सध्या बाजरी काढण्याची वेळ असून, शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यांमधील शेतकरी खरिपाची पिके मोडून, पिके काढून रब्बीची पेरणी करण्याच्या मन:स्थितीत आहेत. रब्बीची पिके घेणाऱ्या पुरंदरमध्ये पाऊस समाधानकारक झालेला नसल्याने चिंता संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावांमध्ये पश्चिम पट्ट्यातील भाताच्या पिकांना आधार मिळाला. फुलोऱ्याच्या स्थितीत असलेल्या भाताच्या पिकाला पाण्याची खूप गरज असते. मात्र भात, भुईमुगाच्या याच फुले येण्याच्या स्थितीत पाऊस पूर्णपणे गायब झाला असून, खाचरांमधील पाणी आटले आहे. तापमानात वाढ झाली आहे. पश्चिम पट्ट्यातही त्यामुळे भात उत्पादनात तीस टक्के घट येण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले, की खरिपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने जेथे उगवण किंवा वाढ समाधानकारक नाही, अशा भागातील शेतकरी पिके मोडून, पिके काढून रब्बीची पेरणी करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता आहे.उभ्या ऊसपिकाला पावसाचा फायदा झालेला नाही. त्यामुळे उसाच्या उत्पादनातही घट येऊ शकेल. एकूणच खरीप भाताच्या वाढीसाठी, रब्बीच्या पेरण्यांची टक्केवारी वाढण्यासाठी काही तालुक्यांमध्ये जोमाच्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, पश्चिम हवेलीसह राष्ट्रीय महामार्गालगतच्या तालुक्यांमध्ये झालेली भाताची पेरणी व पिके तग धरून आहेत. वेळेवर पाऊस झाला असता तर भाताची पिके दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत वाढली असती. पावसाने दीर्घ दडी मारल्यानंतर भाताला फुटवे उशिरा आले. पेरणीनंतर दीड महिन्यात भाताचे पीक हाती येते. या वर्षी पावसाने काही तालुक्यांत दडी मारली तर काही तालुक्यांत तो उशिराने सुरू झाला.