शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

दुष्काळानंतर कांद्याने रडविले

By admin | Updated: May 29, 2016 03:45 IST

मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामतीच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो

बारामती : मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामतीच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो ५ ते ६ रुपये दर मिळत आहे, तर, किरकोळ बाजारामध्ये कांदा ८ ते १० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या घसरलेल्या दराचा फटका प्रामुख्याने बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील गावांना बसला आहे.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिरायती भागातील कारखेल, उंडवडी, देऊळगाव रसाळ, कारखेल या भागातून मोठ्याप्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजारात नवीन गरवी हंगाम सुरू झाला आहे. तसेच, तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी पाणी असल्याने उसाचे पीक टाळून कांदा केला. उष्णतेमुळे कांदा साठवणूक करणे शेतकऱ्याला जिकिरीचे जात आहे. त्यामुळे बाजारात कांदाविक्रीसाठी येत आहे. परिणामी घाऊक व किरकोळ बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात ५ ते ६, तर किरकोळ बाजारात ८ ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आवक वाढल्याने दर घसरले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गतवर्षी कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे कांदालागवडीकडे यंदा कल वाढला. अगदी काही ऊस उत्पादकांनीदेखील कांदा लागवडीला प्राधान्य दिले. मात्र, वाढलेली आवक, घसरलेले कांद्याच्या दरामुळे त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. कांद्याचा उत्पादन कालावधी ऊस पिकाच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळेदेखील कांदा लागवडीकडे कल वाढीस लागल्याचे चित्र आहे. दराच्या प्रतीक्षेत काहींनी कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले. मात्र, साठविलेला कांदा खराब होण्याच्या भीतीपोटी बाजारात आणावा लागत आहे. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी होत आहे.मागील वर्षीपेक्षा सध्या आवक कमी आहे; मात्र यावर्षी उष्णतेमुळे कांद्याला उठाव मिळाला नाही. उष्णतेमुळे गुणवत्ताही ढासळली आहे. याचा परिणाम दरावर होऊन कांद्याचे दर घसरले आहेत; तसेच उष्णतेचा कडाका कायम असल्याने शेतकरी कांदा साठवूही शकत नाही. - अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती