शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

परिस्थिती निवळल्यानंतर, दहावीची २०० गुणांची परीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा, याबाबत केवळ चर्चा सुरू असली, तरी कोरोनामुळे निर्माण झालेली ...

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा, याबाबत केवळ चर्चा सुरू असली, तरी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे निवळल्यानंतर, विद्यार्थ्यांची १०० ते २०० गुणांची परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. तसेच, यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. सीबीएसई बोर्डाने सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित केले. परंतु, राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीकडून केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत काय करायचे, याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांकडे इयत्ता दहावीची परीक्षा दिल्याचे काहीतरी प्रमाणपत्र असावे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयांवर आधारित १०० ते २०० गुणांची एकच परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी सद्य:परिस्थितीत परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सुमारे दोन तासांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे. या परीक्षेत मिळालेले गुण हीच विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका असणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य व माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

पालकांना उत्सुकता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाबाबत काय निर्णय घेणार? याबाबत इयत्ता दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक उत्सुक आहेत. सीबीएसई बोर्डाने निकालाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुद्धा दहावीच्या निकालाची पद्धती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केले जात आहे.