शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘सेझ’मधून भारत फोर्ज बाहेर पडल्यावर १४९ हेक्टर जमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST

------------- राजगुरुनगर: खेड विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) स्थापन केलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड (KDL) या कंपनीतून भारत फोर्ज कंपनी बाहेर ...

-------------

राजगुरुनगर: खेड विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) स्थापन केलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड (KDL) या कंपनीतून भारत फोर्ज कंपनी बाहेर पडल्याने यातील १४९ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडाभरात याबाबत अंतिम अधिसूचना निघणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

खेड सेझसाठी खेड व शिरूर तालुक्यातील सुमारे पाच हजार एकर जमिनीवर शिक्के टाकण्यात आले होते;मात्र तत्कालीन शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असल्याने जमिनींच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा तसेच संपादनावेळी शेतकऱ्यांना कबूल केल्याप्रमाणे १५ टक्के जमिनीचा परतावा देण्यात यावा यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार सुरेश गोरे यांच्यासमवेत शेतकरी शिष्टमंडळ व उद्योग मंत्री सुभाष देसाई तसेच एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या. शिवसेनेच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रत्येकवेळी सेझबाधित शेतकऱ्यांची बाजू सक्षमपणे मांडण्यात आली होती.

याबाबत माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, सेझबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नुकतीच मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या या भेटीवेळी मंत्री महोदयांनी भारत फोर्ज कंपनी केडीएलमधून बाहेर पडत असून याबाबतची अंतिम अधिसूचना येत्या आठवडाभरात काढणार असल्याचे सांगितले.

या भेटीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे आदी उपस्थित होते.

--

कोट

केडीएल कंपनीचे मालक हे शेतकरी असून केडीएल व भारत फोर्ज या जागांचे एकत्रित मालक होते; मात्र भारत फोर्ज कंपनी यामधून बाहेर पडल्याने या जागांवर केडीएल या शेतकऱ्यांच्या कंपनीकडे १४९ हेक्टर जागेची पूर्ण मालकी राहणार आहे. या जागांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याकरिता एमआयडीसी व अनेक बड्या उद्योग समूहांशी माझी चर्चा सुरु आहे. शेतकरी हितासाठी शिवसेनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व उद्योगमंत्रालयाची यशस्वी शिष्टाई कामी आली.

-शिवाजीराव आढळराव पाटील

शिवसेना नेते