शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘सेझ’मधून भारत फोर्ज बाहेर पडल्यावर १४९ हेक्टर जमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST

------------- राजगुरुनगर: खेड विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) स्थापन केलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड (KDL) या कंपनीतून भारत फोर्ज कंपनी बाहेर ...

-------------

राजगुरुनगर: खेड विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) स्थापन केलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड (KDL) या कंपनीतून भारत फोर्ज कंपनी बाहेर पडल्याने यातील १४९ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडाभरात याबाबत अंतिम अधिसूचना निघणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

खेड सेझसाठी खेड व शिरूर तालुक्यातील सुमारे पाच हजार एकर जमिनीवर शिक्के टाकण्यात आले होते;मात्र तत्कालीन शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असल्याने जमिनींच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा तसेच संपादनावेळी शेतकऱ्यांना कबूल केल्याप्रमाणे १५ टक्के जमिनीचा परतावा देण्यात यावा यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार सुरेश गोरे यांच्यासमवेत शेतकरी शिष्टमंडळ व उद्योग मंत्री सुभाष देसाई तसेच एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या. शिवसेनेच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रत्येकवेळी सेझबाधित शेतकऱ्यांची बाजू सक्षमपणे मांडण्यात आली होती.

याबाबत माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, सेझबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नुकतीच मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या या भेटीवेळी मंत्री महोदयांनी भारत फोर्ज कंपनी केडीएलमधून बाहेर पडत असून याबाबतची अंतिम अधिसूचना येत्या आठवडाभरात काढणार असल्याचे सांगितले.

या भेटीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे आदी उपस्थित होते.

--

कोट

केडीएल कंपनीचे मालक हे शेतकरी असून केडीएल व भारत फोर्ज या जागांचे एकत्रित मालक होते; मात्र भारत फोर्ज कंपनी यामधून बाहेर पडल्याने या जागांवर केडीएल या शेतकऱ्यांच्या कंपनीकडे १४९ हेक्टर जागेची पूर्ण मालकी राहणार आहे. या जागांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याकरिता एमआयडीसी व अनेक बड्या उद्योग समूहांशी माझी चर्चा सुरु आहे. शेतकरी हितासाठी शिवसेनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व उद्योगमंत्रालयाची यशस्वी शिष्टाई कामी आली.

-शिवाजीराव आढळराव पाटील

शिवसेना नेते