शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

पीकविम्यात कंपन्यांचाच फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा कंपन्यांचीच चलती होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात खरिपाच्या यंदाच्या हंगामात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा कंपन्यांचीच चलती होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात खरिपाच्या यंदाच्या हंगामात योजनेचा प्रतिसाद कमी झाला आहे. दावा दाखल करण्यासाठी कंपन्यांच्या अटी, नियम जाचक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक पिकाचा विमा हप्ता वेगवेगळा असतो व जोखीम, संरक्षित रक्कमही वेगवेगळी असते. नुकसानीनंतर ७२ तासांच्या कंपनीला कळवणे, सरकारी अधिकाऱ्यांकडून अधिकृत पंचनामे होणे, त्याचा संगणकीकृत सर्व्हे क्रमांक, नकाशा अपलोड करणे, नुकसानीचे प्रमाण विशिष्ट असणे, परिसरात आणखी शेतकऱ्यांचे नुकसान होणे, अशा अनेक अटींची पूर्तता विमा मागणी करताना करावी लागते.

विमा थेट नाकारला जात नाही, मात्र कागदपत्र अपूर्ण या कारणाखाली तो दिलाही जात नाही. विलंब होत जातो.

-- मागील वर्षी पीकविमा उतरवणारे जिल्ह्यातील एकूण शेतकरी - २८ हजार ४६७

या वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी - १३ हजार ४३८

--- जिल्ह्याचे एकूण खरीप क्षेत्र - २ लाख १४ हजार हेक्टर

प्रमुख पीक व क्षेत्र

अ- भात-- ५७ हजार ९६७

ब- बाजरी-- ३८ हजार ५६१

क- मका-- १७ हजार १३५

ड- मूग-- १३ हजार ८०४

इ-- सोयाबीन-- १७ हजार ४८२

---//

कंपनीच्या अटी सुलतानी आहेत. जाचक आहेत. त्यांचे पालन करून विमा मागणी दाखल करायची म्हणजे एक मोठी कसरत आहे.

संतोष शेलार- शेतकरी, ता. शिरूर, वडगाव

---//

पीककर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची नावे विमा पोर्टलवर मुदतीनंतर १५ दिवसांनी दाखल होतात. त्यामुळे यंदाच्या संख्येत वाढ होऊ शकते. नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांची विमा मागणी मंजूर व्हावी, असेच आमचे प्रयत्न असतात.

ज्ञानेश्वर बोटे- जिल्हा कृषी अधीक्षक

मागील वर्षीची आकडेवारी

खरिपाचे जिल्ह्याचे एकूण क्षेत्र : २ लाख १४ हजार हेक्टर

२८ हजार ४६७ जणांंनी उतरवला

४ हजार ३७२ जणांना मिळाला

१७५७ हेक्टर क्षेत्राचा विमा मंजूर झाला

२ कोटी ११ लाख १४ हजार नुकसानभरपाईसाठी मिळाले.

९८ लाख रुपये २ टक्के शेतकरी हिस्सा म्हणून जमा झाले होते.