शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पीकविम्यात कंपन्यांचाच फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा कंपन्यांचीच चलती होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात खरिपाच्या यंदाच्या हंगामात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा कंपन्यांचीच चलती होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात खरिपाच्या यंदाच्या हंगामात योजनेचा प्रतिसाद कमी झाला आहे. दावा दाखल करण्यासाठी कंपन्यांच्या अटी, नियम जाचक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक पिकाचा विमा हप्ता वेगवेगळा असतो व जोखीम, संरक्षित रक्कमही वेगवेगळी असते. नुकसानीनंतर ७२ तासांच्या कंपनीला कळवणे, सरकारी अधिकाऱ्यांकडून अधिकृत पंचनामे होणे, त्याचा संगणकीकृत सर्व्हे क्रमांक, नकाशा अपलोड करणे, नुकसानीचे प्रमाण विशिष्ट असणे, परिसरात आणखी शेतकऱ्यांचे नुकसान होणे, अशा अनेक अटींची पूर्तता विमा मागणी करताना करावी लागते.

विमा थेट नाकारला जात नाही, मात्र कागदपत्र अपूर्ण या कारणाखाली तो दिलाही जात नाही. विलंब होत जातो.

-- मागील वर्षी पीकविमा उतरवणारे जिल्ह्यातील एकूण शेतकरी - २८ हजार ४६७

या वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी - १३ हजार ४३८

--- जिल्ह्याचे एकूण खरीप क्षेत्र - २ लाख १४ हजार हेक्टर

प्रमुख पीक व क्षेत्र

अ- भात-- ५७ हजार ९६७

ब- बाजरी-- ३८ हजार ५६१

क- मका-- १७ हजार १३५

ड- मूग-- १३ हजार ८०४

इ-- सोयाबीन-- १७ हजार ४८२

---//

कंपनीच्या अटी सुलतानी आहेत. जाचक आहेत. त्यांचे पालन करून विमा मागणी दाखल करायची म्हणजे एक मोठी कसरत आहे.

संतोष शेलार- शेतकरी, ता. शिरूर, वडगाव

---//

पीककर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची नावे विमा पोर्टलवर मुदतीनंतर १५ दिवसांनी दाखल होतात. त्यामुळे यंदाच्या संख्येत वाढ होऊ शकते. नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांची विमा मागणी मंजूर व्हावी, असेच आमचे प्रयत्न असतात.

ज्ञानेश्वर बोटे- जिल्हा कृषी अधीक्षक

मागील वर्षीची आकडेवारी

खरिपाचे जिल्ह्याचे एकूण क्षेत्र : २ लाख १४ हजार हेक्टर

२८ हजार ४६७ जणांंनी उतरवला

४ हजार ३७२ जणांना मिळाला

१७५७ हेक्टर क्षेत्राचा विमा मंजूर झाला

२ कोटी ११ लाख १४ हजार नुकसानभरपाईसाठी मिळाले.

९८ लाख रुपये २ टक्के शेतकरी हिस्सा म्हणून जमा झाले होते.