पुणे : शृंगाररसयुक्त हसतखेळत केलेल्या चर्चेने जीवनातील रुक्षपणा व ताण निश्चितपणे कमी होतो आणि जगण्यातील आनंद वाढतो, असे मत श्याम भुर्के यांनी व्यक्त केले. सम्राट नाईक यांच्या ‘शृंगारसहस्त्रकम’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन भुर्के यांच्या हस्ते झाले. अॅड. अनुराधा भारती उपस्थित होत्या. एका महिन्यात ११५१ चारोळ्या लिहिल्याबद्दल सम्राट नाईक यांना भारत बुक आॅफ वर्ल्डचे डॉ. नारायण फड यांच्या हस्ते विश्वविक्रम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉ. मधुसूदन घाणेकर अध्यक्षस्थानी होते. ‘शृंगार नवरसांचा राजा’ या विषयावरील कथा-काव्य-निबंध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. कथा स्पर्धेत नंदू लांडगे, काव्य स्पर्धेत नूतन शेटे, तर निबंध स्पर्धेत अनघा ठोंबरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या वेळी पांडुरंग तांबे, मनीष गोखले, अंजली घुले, रंजना काळभोर, राजश्री नाईक, गौरी लेले, जयंत साठे, कृपा नाईक, अथर्व नाईक, प्रकाश देशपांडे, डॉ. सत्यशील नाईक, मोनिका जोशी, रजनी अंतापूरकर यांना उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल गौरविण्यात आले. जयश्री नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता श्रावणे यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली नाईक यांनी आभार मानले.
शृंगाररसयुक्त चर्चेतून जगण्यातील आनंद वाढतो
By admin | Updated: April 28, 2017 06:03 IST