शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

विद्यापीठाच्या प्रत्यक्ष परीक्षेला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:11 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी प्रथम सत्राची परीक्षा शनिवारपासून (दि.१०) सुरू होत आहे. या परीक्षेपूर्वी घेतलेल्या ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी प्रथम सत्राची परीक्षा शनिवारपासून (दि.१०) सुरू होत आहे. या परीक्षेपूर्वी घेतलेल्या सराव परीक्षेलाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे ६५ टक्के विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे. सर्व विषयांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील संलग्न महाविद्यालयांतील ५ लाख विद्यार्थी ८० हजार २२४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यातील ३ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे. विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशनतर्फे परीक्षा घेतली जात असून, परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. नियमित बॅकलॉग, एटीकेटी अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा एमसीक्यू पध्दतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर ४८ तासांत त्यांच्या स्टुडंट प्रोफाइलला दिसणार आहे. विद्यार्थ्यांचा स्कोअर जाहीर झाल्यानंतर ४८ तासांच्या आत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास स्टुडंट प्रोफाइलला विद्यार्थ्यांना त्यांची तक्रार नोंदवता येणार आहे.

‘एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन’च्या तांत्रिक विभागाचे प्रमुख गजानन अमलापुरे म्हणाले, रोज ८० हजार ते १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होईल या पध्दतीने परीक्षेचे नियोजन केले असून ही परीक्षा सुमारे ४० ते ४५ दिवस चालणार आहे. एक विद्यार्थी किमान ५ ते ६ विषयांची परीक्षा देणार आहे. त्यामुळे तब्बल ३२ लाख परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असेल, असे मानले जात आहे.

--

हेल्पलाईनवर अडचणी सांगता येतील

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांच्यासाठी ०२०-७१५३०२०२ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. याशिवाय विद्यापीठाच्या एक्झाम सेक्शनमध्येच एक चॅट बॉक्स ही विद्यार्थ्यांना दिसेल. त्यावर ते त्यांच्या अडचणी सांगू शकतात. अद्याप युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा व युजरनेम व पासवर्ड मिळवावा.

--

सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. त्यानंतरही काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.

डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ