शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आळंदी शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई

By admin | Updated: June 12, 2016 05:58 IST

अवघ्या महाराष्ट्राची वैभवशाली आध्यात्मिक परंपरा सांगणारी पायी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, अलंकापुरी या सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. पालिकेने यासाठी कंबर कसली

आळंदी : अवघ्या महाराष्ट्राची वैभवशाली आध्यात्मिक परंपरा सांगणारी पायी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, अलंकापुरी या सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. पालिकेने यासाठी कंबर कसली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आजपासून (दि. ११) कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी पालिकेने छोट्या व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत छोट्या व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढली. यामुळे अतिक्रमणाने व्यापलेला आळंदीतील निम्मा भाग मोकळा झाला असून, पालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.प्रदक्षिणा मार्ग, मरकळ रस्ता, वडगाव रस्ता, इंद्रायणी घाट रस्त्यावरील व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढत आहेत. त्यामुळे आजपासून दोन ते तीन दिवस स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सवलत दिली जाणार असून, तद्नंतर मात्र पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार आहे. (वार्ताहर) परराज्यांतील वारकरी : दाखल होण्यास सुरुवातसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी परराज्यांतील दुर्गम भागातून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दहा दिवसांत राज्यासह परराज्यांतून भाविक लाखोंच्या संख्येने आळंदीत दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे काम सद्या प्रशासनाकडून हातात घेण्यात आले आहे. याच दृष्टीने शुक्रवारी प्रांताधिकारी खराडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत तत्काळ अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशान्वये आज पालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांना तोंडी व लेखी सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेचे पालन करत काही व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे काढली.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असून, या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली जात आहे. पालिकेकडून दोन ते तीन दिवस व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले जात असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्वत:हून अतिक्रमणे हटवा, कारवाई टाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे. - डॉ. संतोष टेंगळे, मुख्याधिकारी