शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई

By admin | Updated: June 12, 2016 05:58 IST

अवघ्या महाराष्ट्राची वैभवशाली आध्यात्मिक परंपरा सांगणारी पायी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, अलंकापुरी या सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. पालिकेने यासाठी कंबर कसली

आळंदी : अवघ्या महाराष्ट्राची वैभवशाली आध्यात्मिक परंपरा सांगणारी पायी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, अलंकापुरी या सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. पालिकेने यासाठी कंबर कसली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आजपासून (दि. ११) कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी पालिकेने छोट्या व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत छोट्या व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढली. यामुळे अतिक्रमणाने व्यापलेला आळंदीतील निम्मा भाग मोकळा झाला असून, पालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.प्रदक्षिणा मार्ग, मरकळ रस्ता, वडगाव रस्ता, इंद्रायणी घाट रस्त्यावरील व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढत आहेत. त्यामुळे आजपासून दोन ते तीन दिवस स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सवलत दिली जाणार असून, तद्नंतर मात्र पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार आहे. (वार्ताहर) परराज्यांतील वारकरी : दाखल होण्यास सुरुवातसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी परराज्यांतील दुर्गम भागातून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दहा दिवसांत राज्यासह परराज्यांतून भाविक लाखोंच्या संख्येने आळंदीत दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे काम सद्या प्रशासनाकडून हातात घेण्यात आले आहे. याच दृष्टीने शुक्रवारी प्रांताधिकारी खराडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत तत्काळ अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशान्वये आज पालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांना तोंडी व लेखी सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेचे पालन करत काही व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे काढली.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असून, या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली जात आहे. पालिकेकडून दोन ते तीन दिवस व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले जात असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्वत:हून अतिक्रमणे हटवा, कारवाई टाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे. - डॉ. संतोष टेंगळे, मुख्याधिकारी